शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राज्यातील निवडणुकीत बदलणार भाजपाची रणनीती; महाराष्ट्रात होणार का 'याचा' फायदा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 17:49 IST

BJP: भाजपाच्या सूत्रांनुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे भाजपा नेतृत्वात चिंतेच वातावरण आहे.

ठळक मुद्देराज्यात सक्षम चेहरा न दिल्याने पक्षाला काही प्रमाणात याचा मोठा फटका बसलाराज्यात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्याचं भाजपाचं लक्ष्य विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे भाजपा नेतृत्वात चिंतेच वातावरणपंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सर्वात लोकप्रिय आहेत यात शंका नाही

नवी दिल्ली - झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपाकडून नव्या रणनीतीची तयारी सुरु आहे. राज्यात ५० टक्क्याहून अधिक मतदान मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला पुढे आणणं, समान विचारधारेच्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी करणे याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. 

झारखंडमध्ये जेवीएम(पी) नेते बाबूलाल मरांडी यांना पुन्हा भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा नेतृत्वाने भविष्यात राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये संभाव्य मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्याला प्राधान्य देईल. मागील आठवड्यात झालेल्या चिंतन बैठकीत यावर चर्चा झाली. दिल्ली, झारखंडमधील पराभवाचं कारण म्हणजे या राज्यात भाजपाने लोकप्रिय असलेल्या उमेदवाराची निवड केली नव्हती. झारखंडमध्ये रघुवर दास यांच्या नेतृत्वात पक्षाने निवडणूक लढवली, मात्र त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीच्या बातम्या नेतृत्वाला मिळत होत्या. तर दिल्लीत कोणालाची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपाने घोषित केलं नाही. 

भाजपाच्या सूत्रांनुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे भाजपा नेतृत्वात चिंतेच वातावरण आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाला मित्रपक्षांसोबत १७ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. मात्र राज्यातील निवडणुकीत ते खूप मागे राहिले. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुर्वेकडील राज्यात भाजपाला प्रादेशिक पक्षाचं कडवं आव्हान आहे. 

पक्षाच्या रणनीतीकारांनी सांगितले की, राज्यात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्याचं आमचं लक्ष्य आहे. कारण जर प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत गेल्यास निवडणुकीत त्यांना मिळणारं मतदान अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रादेशिक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासोबतच प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करण्याची रणनीती पक्षाने समोर आणली आहे. 

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डिवेलपिंग सोसायटीचे संचालक संजय कुमार यांनी सांगितले की, भाजपाने राज्यात सक्षम चेहरा न दिल्याने पक्षाला काही प्रमाणात याचा मोठा फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सर्वात लोकप्रिय आहेत यात शंका नाही पण प्रादेशिक निवडणुकीत त्यांच्या मर्यादा असतात. दिल्लीनंतर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र अद्याप पश्चिम बंगालमधील रणनीती स्पष्ट नाही.  

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूक