शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

राज्यातील निवडणुकीत बदलणार भाजपाची रणनीती; महाराष्ट्रात होणार का 'याचा' फायदा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 17:49 IST

BJP: भाजपाच्या सूत्रांनुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे भाजपा नेतृत्वात चिंतेच वातावरण आहे.

ठळक मुद्देराज्यात सक्षम चेहरा न दिल्याने पक्षाला काही प्रमाणात याचा मोठा फटका बसलाराज्यात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्याचं भाजपाचं लक्ष्य विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे भाजपा नेतृत्वात चिंतेच वातावरणपंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सर्वात लोकप्रिय आहेत यात शंका नाही

नवी दिल्ली - झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपाकडून नव्या रणनीतीची तयारी सुरु आहे. राज्यात ५० टक्क्याहून अधिक मतदान मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला पुढे आणणं, समान विचारधारेच्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी करणे याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. 

झारखंडमध्ये जेवीएम(पी) नेते बाबूलाल मरांडी यांना पुन्हा भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा नेतृत्वाने भविष्यात राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये संभाव्य मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्याला प्राधान्य देईल. मागील आठवड्यात झालेल्या चिंतन बैठकीत यावर चर्चा झाली. दिल्ली, झारखंडमधील पराभवाचं कारण म्हणजे या राज्यात भाजपाने लोकप्रिय असलेल्या उमेदवाराची निवड केली नव्हती. झारखंडमध्ये रघुवर दास यांच्या नेतृत्वात पक्षाने निवडणूक लढवली, मात्र त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीच्या बातम्या नेतृत्वाला मिळत होत्या. तर दिल्लीत कोणालाची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भाजपाने घोषित केलं नाही. 

भाजपाच्या सूत्रांनुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे भाजपा नेतृत्वात चिंतेच वातावरण आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाला मित्रपक्षांसोबत १७ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. मात्र राज्यातील निवडणुकीत ते खूप मागे राहिले. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुर्वेकडील राज्यात भाजपाला प्रादेशिक पक्षाचं कडवं आव्हान आहे. 

पक्षाच्या रणनीतीकारांनी सांगितले की, राज्यात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्याचं आमचं लक्ष्य आहे. कारण जर प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत गेल्यास निवडणुकीत त्यांना मिळणारं मतदान अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रादेशिक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासोबतच प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करण्याची रणनीती पक्षाने समोर आणली आहे. 

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डिवेलपिंग सोसायटीचे संचालक संजय कुमार यांनी सांगितले की, भाजपाने राज्यात सक्षम चेहरा न दिल्याने पक्षाला काही प्रमाणात याचा मोठा फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सर्वात लोकप्रिय आहेत यात शंका नाही पण प्रादेशिक निवडणुकीत त्यांच्या मर्यादा असतात. दिल्लीनंतर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र अद्याप पश्चिम बंगालमधील रणनीती स्पष्ट नाही.  

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूक