शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षांच्या आघाडीला भाजपाचं आघाडीनंच प्रत्युत्तर, NDAमधील घटक पक्षांचं बलाबल किती? अशी आहे आकडेवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 09:49 IST

BJP NDA: काही महिन्यांवर आलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन प्रमुख आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

काही महिन्यांवर आलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन प्रमुख आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. एकीकडे कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यात सुमारे २४ हून अधिक पक्ष सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सुमारे ३० हून अधिक पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट, आरपीआय (ए), अजित पवार गट यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि पूर्वोत्तर राज्यांमधील अनेक पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात काँग्रेसकडून देशात एक व्यापक आघाडी उघडण्याची मोर्चेबांधणी सुरू असताना भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएमधील घटक पक्षांचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.आज होणाऱ्या बैठकीसाठी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एनडीएच्या बैठकीसाठी ३८ पक्षांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होत असलेल्या घटक पक्षांची ताकद किती आहे, ते पक्ष कुठे प्रबळ आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बिहारचा विचार केल्यास जितनराम मांझी, उपेंद्र कुशवाहा आणि चिराग पासवान यांचा विचार केल्यास सुमारे २० टक्के मतांवर त्यांची चांगली पकड आहे. बिहारमधील सुमारे १६ टक्के दलित आणि महादलित मतदार आहेत. यामधील टक्के पासवान आहेत. राज्यातील एकूण मतदारांमध्ये महादलितांची संख्या १० टक्के आहे. यामध्ये सहा टक्के मुसहर आहेत. जितनराम मांझी हे या जातीचं प्रतिनिधित्व करतात. तर उपेंद्र कुशवाहा हे कोईरी जातीचं प्रतिनिधित्व करतात. त्यांची संख्या सुमारे ८ टक्के आहे. या सर्व मतदारांची मोट बांधून लालू आणि नितीश कुमार यांच्या पक्षांचा पराभव करण्याचा भाजपा प्रयत्न आहे.

उत्तर प्रदेशचा विचार केल्यास पूर्वांचलमधील तीन पक्षांना एनडीएच्या बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (एस), ओमप्रकाश राजभर यांचा सुभासपा आणि संजय निषाद यांच्या निषाद पार्टी या पक्षांच्या मदतीने पूर्वांचलमधील आपली समिकरणे जुळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पूर्वांचलमधील सुमारे डझनभर मतदारसंघांमध्ये राजभर मतदार जय-पराजयाचं गणित निश्चित करतात. राजभर मतदारांसोबत जर निषाद आणि कुर्मी मतदार भेटले तर पूर्वांचलमधील अनेक मतदारसंघात विजय निश्चित होईल, असं भाजपाला वाटतं. पूर्वांचलमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. येथे २०१९ मध्ये ६ जागांवर भाजपाचा पराभव झाला होता.

तामिळनाडूमधील राजकारण द्विध्रुवीय असून, येथे भाजपाची ओळख उत्तर भारतातील पक्ष अशी आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके, पीएमके, आयएमकेएमके अशा पक्षांना सोबत घेऊन अस्तित्व निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. सध्या तामिळनाडूमध्ये भाजपाचे चार आमदार आहेत. तर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत मिळुन आंध्र आणि तेलंगाणामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर होणाऱ्या संभाव्य नुकसानाची भरपाई भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना सोबत आणून करण्याचा प्रयत्न केला आहे. २०१९ मध्ये भाजपाने महाराष्ट्रात २३ जागा जिंकल्या होत्या. तो आकडा कायम ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

छोटे पक्ष सोबत असण्या-नसण्याचे फायदे तोटे भाजपाने २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनुभवले आहेत. अटीतटीच्या लढतींमध्ये या छोट्या पक्षांची ४-५ टक्के मतं अनेकदा निर्णायक ठरतात. तसेच ही मतं त्यांच्या आघाडीतील सहकाऱ्याकडे सहजपणे वळतात. आता भाजपा छोट्या पक्षांना सोबत आणून काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येत असलेल्या विरोधी पक्षांना रोखण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहावे लागेल.  

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी