शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचं OBC कार्ड?; १० राज्यांच्या नेत्यांसोबत अमित शाहांची मध्यरात्रीपर्यंत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 12:40 IST

२०१४ असो वा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांनी भाजपाला पसंती दर्शवली होती.

नवी दिल्ली – बिहारनंतर आता विविध राज्यात भाजपाचे मित्रपक्ष जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत आहेत. त्यानंतर सत्ताधारी भाजपानं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ओबीसी मते आकर्षिक करण्याचा विरोधी पक्षाचा डाव उधळण्यासाठी भाजपा सतर्क झाली आहे. राहुल गांधी यांच्या जितकी लोकसंख्या तितका हक्क या विधानानंतर भाजपानं ओबीसी समुदायाला जवळ करण्यासाठी सरकारी योजनांची यादी तयार केली आहे. मागील २ निवडणुकीत ओबीसी मतदार मोठ्या संख्येने भाजपासोबत राहिले. त्यामुळे हक्काचा मतदार गमावणं भाजपाला परवडणारं नाही. त्यामुळे पक्षाकडून वरिष्ठ पातळीवर स्वत: भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

२०१४ असो वा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांनी भाजपाला पसंती दर्शवली होती. २०१४ च्या तुलनेत २०१९ ला ओबीसी मतदारांनी भाजपाला मतदान केले. २०१४ ला ३० टक्के तर २०१९ ला ४० टक्के ओबीसी समाज भाजपासोबत होता. आता याच ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी विरोधी पक्ष राजकीय खेळी करत आहेत. त्यामुळे २०२४ ला ओबीसी मतदार भाजपासोबतच राहतील यासाठी पक्षाकडून योजना आखली जात आहे.

गुरुवारी भाजपाच्या पार्टी मुख्यालयात बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रसह १० राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते यांची बैठक झाली. या बैठकीत आरक्षण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भाजपासाठी ओबीसी मतदार महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभेसाठी भाजपा अशी कुठलीही चूक करणार नाही जेणेकरून ओबीसी मतदार पक्षापासून दूरावणार नाही. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीएल संतोष, बिहार भाजपा सम्राट चौधरी, ओबीसी मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण यांचा समावेश होता.

बैठकीत केंद्रीय नेतृत्वाने ओबीसी समाजापर्यंत पोहचणे आणि जास्तीत जास्त ओबीसी समाजाला पक्षाच्या बाजूने वळवणे यावर जोर दिला. पक्षाने उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ओबीसी समाजाला एकत्र ठेवण्याची रणनीती आखली. या समाजाच्या मतांनी राज्याच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारकडून ओबीसी समाजासाठी असणाऱ्या योजना, त्यांचा लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आढावा घ्यायला सांगितले.

ओबीसी समाजावर आपली मजबूत पकड कायम ठेवण्यासाठी भाजपने एक समितीही स्थापन केली आहे. भाजप सरकारने मागासवर्गीयांच्या हिताचे जास्तीत जास्त काम आणि निर्णय घेतल्याचे भाजप नेत्यांनी ओबीसी समाजाला जाऊन सांगावे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. यासोबतच निवडणुकीचा प्रचार ओबीसी केंद्रीत करण्याचेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहOBC Reservationओबीसी आरक्षण