शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भाजपच्या निम्म्या सदस्यांचे 'आप'ला मतदान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 11:13 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचे नियोजन शिस्तबद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्लीत भाजपचा प्रचार केला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

नवी दिल्ली - आशिया खंडातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या हातून देशातील एक-एक राज्य निसटून जात आहे. आधी छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र, झारखंड आणि आता दिल्लीही भाजपच्या हातून गेली आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपचा वाईट काळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीत तर भाजपच्या निम्या सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत 'आप'ला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. 

मागील सहा वर्षांच्या काळात भाजपने देशात संघटन मजबूत केले आहे. बुथ लेव्हलपासून नियोजन असणाऱ्या भाजपच्या सदस्य नोंदणीचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात भाजपची यंत्रणा इतर पक्षांच्या तुलनेत आघाडीवर असते. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचे नियोजन शिस्तबद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्लीत भाजपचा प्रचार केला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

दिल्लीत भाजपची सदस्य संख्या 62.28 लाख एवढी आहे. खुद्द भाजपनेच हा दावा केला होता. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जिंकणे काहीही कठिण नसल्याचे दिसत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला केवळ 35 लाख 66 हजार मते मिळाली आहे. भाजपचा सदस्य नोंदणीचा दावा खरा असेल तर निम्म्या भाजप सदस्यांनी 'आप'ला मतदान केले हे स्पष्ट होते. 

काँग्रेसचीही निम्मी मते 'आप'लाचदिल्लीत काँग्रेसचे 7 लाख सदस्य असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता. त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसला देखील केवळ साडेतीन लाख मते मिळाली आहे. अर्थात अर्धी मते आपच्याच खात्यात गेल्याचे दिसून येत आहे.