शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:36 IST

ईशान्येकडून ४ उमेदवार विजयी, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे ४ उमेदवार राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे संख्याबळ आता १०१ झाले असून, शतक गाठणारा १९८८ नंतरचा पहिलाच पक्ष ठरला आहे.

आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ईशान्येकडील  राज्यातून राज्यसभेत प्रथमच काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. आसाममधून भाजपच्या पवित्र मार्गारिटा आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाच्या रंग्रा नरजारी यांनी विजय मिळविला आहे. मार्गरिटा यांना ४६, तर नरजारी यांना ४४ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान राज्यसभा सदस्य रिपुन बाेरा यांना ३५ मते मिळाली. बाेरा यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. नागालँडमधून भाजपच्या उमेदवार एस. फांगनाॅन यांची बिनविराेध निवड झाली आहे. या राज्यातून प्रथमच राज्यसभेवर महिला प्रतिनिधित्व मिळाले आहे, तर त्रिपुरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी माकपचे उमेदवार व आमदार भानूलाल साहा यांचा पराभव केला.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समीकरण बदललेn राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० हून अधिक झाले आहे. याचा आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर परिणाम हाेणार आहे. n अनेक विराेधक निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. आपचेही संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या निवडणुकीसाठी समीकरण बदलले आहे.

आपचे संख्याबळ वाढलेn पंजाब विधानसभेत माेठे यश मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीचेही राज्यसभेतील संख्याबळ वाढले आहे. n आपने पंजाबमधील पाचही जागा जिंकल्या आहेत. n त्यामुळे आपचे ८ सदस्य राज्यसभेत झाले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूMember of parliamentखासदार