शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:36 IST

ईशान्येकडून ४ उमेदवार विजयी, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे ४ उमेदवार राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पक्षाचे संख्याबळ आता १०१ झाले असून, शतक गाठणारा १९८८ नंतरचा पहिलाच पक्ष ठरला आहे.

आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ईशान्येकडील  राज्यातून राज्यसभेत प्रथमच काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. आसाममधून भाजपच्या पवित्र मार्गारिटा आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाच्या रंग्रा नरजारी यांनी विजय मिळविला आहे. मार्गरिटा यांना ४६, तर नरजारी यांना ४४ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान राज्यसभा सदस्य रिपुन बाेरा यांना ३५ मते मिळाली. बाेरा यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. नागालँडमधून भाजपच्या उमेदवार एस. फांगनाॅन यांची बिनविराेध निवड झाली आहे. या राज्यातून प्रथमच राज्यसभेवर महिला प्रतिनिधित्व मिळाले आहे, तर त्रिपुरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी माकपचे उमेदवार व आमदार भानूलाल साहा यांचा पराभव केला.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समीकरण बदललेn राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० हून अधिक झाले आहे. याचा आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर परिणाम हाेणार आहे. n अनेक विराेधक निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. आपचेही संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या निवडणुकीसाठी समीकरण बदलले आहे.

आपचे संख्याबळ वाढलेn पंजाब विधानसभेत माेठे यश मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीचेही राज्यसभेतील संख्याबळ वाढले आहे. n आपने पंजाबमधील पाचही जागा जिंकल्या आहेत. n त्यामुळे आपचे ८ सदस्य राज्यसभेत झाले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूMember of parliamentखासदार