शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

भाजपचा २०२४ साठी मोठा प्लॅन! १० % मते वाढवण्यासाठी राज्यसभेचे खासदारही मैदानात उतरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 15:28 IST

देशात काही महिन्यातच लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत.

देशात काही महिन्यातच लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत.  सर्व पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला महत्त्वाच्या जागांवर आपले उमेदवार काही महिने अगोदर ठरवायचे आहेत जेणेकरून उमेदवारांना जनतेशी संपर्क साधण्यासाठी वेळ मिळेल. भाजपला बंगाल, तेलंगणा, ओडिशा, आंध्र, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये आधी उमेदवार घोषित करायचे आहेत, जिथे पक्षाची स्थिती उत्तर आणि पश्चिम भारताच्या तुलनेत थोडीशी कमकुवत आहे. अशा स्थितीत भाजपला उमेदवार निवडीचे काम सुरू करायचे आहे. गेल्या आठवड्यात यासंदर्भात पक्षाची दोन दिवसीय बैठक झाली, यामध्ये स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

कोरोनात वडील गमावले, कुटुंबाची घेतली जबाबदारी; 25 व्या वर्षी झाली डिप्टी कलेक्टर

राज्यसभेतील सदस्यांनाही लोकसभेसाठी मैदानात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन आहे.  या नेत्यांमध्ये एस. जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे, जे सरकारचे भाग आहेत परंतु राज्यसभेतून येतात. या नेत्यांना रिंगणात उतरवल्याने वातावरण तयार होईल आणि काही जागांवर विजय निश्चित होऊ शकेल, असे पक्षाला वाटते.

याशिवाय निवडणुकीनंतर संघटनेतून इतर अनेक नेत्यांना सभागृहात आणले जाऊ शकते. हाच फॉर्म्युला नुकताच पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आजमावण्यात आला. येथे भाजपने राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंत अनेक खासदार आणि मंत्र्यांना उमेदवारी दिली होती.

तिन्ही राज्यात भाजपने बाजी मारली असून अनेक दिग्गज नेते आता राज्य सरकारचा भाग आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, असे मानले जात आहे. त्यामुळे जानेवारीअखेर भाजपला मोठ्या संख्येने उमेदवार निश्चित करायचे आहेत. २०१९ च्या तुलनेत निवडणुकीत मतांची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढणार असल्याचे पक्षाने सांगितले आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे लक्ष्य दिले. 

भाजपला एकट्याला ५०% मते 

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला ३७ टक्के आणि एनडीएला ४५ टक्के मते मिळाली होती. आता एकट्या भाजपला ते ५० टक्क्यांच्या जवळ न्यायचे आहे. तेलंगणा, ओडिशा, आंध्र आणि बंगाल यांसारख्या राज्यांतील कामगिरी पूर्वीपेक्षा सुधारली तर आकडे चांगले असतील, असा भाजपचा विश्वास आहे. भाजपने सध्या किती जागा जिंकायच्या आहेत हे ठरवले नसले तरी २०१९ पेक्षा ही संख्या चांगली असावी, अशी तयारी निश्चित केली आहे. तेव्हा एकट्या भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी