शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची लढाई प्रादेशिक पक्षांशीच - रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 05:47 IST

पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार यात कोणतीही शंका नाही. आम्ही २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकू. मोदी यांचे समर्पण व प्रामाणिकपणाबद्दल सामान्य लोकांमध्ये असलेला विश्वास हाच आमची शक्ती आहे.

- संतोष ठाकूरभाजपाला यंदा कमी जागा मिळण्याची चर्चा आहे...?पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार यात कोणतीही शंका नाही. आम्ही २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकू. मोदी यांचे समर्पण व प्रामाणिकपणाबद्दल सामान्य लोकांमध्ये असलेला विश्वास हाच आमची शक्ती आहे.मग प्रत्येक राज्यात युती का?ती आमच्या समरसतेचे प्रतीक आहे. आम्ही फक्त युती करतो असे नाही, तर एक समान मुद्दे असलेल्या पक्षाला एका व्यासपीठावर आणतो. समजूतदारीने सरकार चालविण्याचा विश्वास एक दुसऱ्याला देतो.विरोधकांच्या आघाडीपेक्षा तुम्ही वेगळे कसे?देशात विरोधकांची आघाडीच नाही. उत्तर प्रदेशात सपा—बसपाने काँग्रेसला बाहेर ठेवले आहे, बिहारमध्ये राजद व काँग्रेस यांच्यात तणाव आहेत. बंगालमध्ये तृणमूलने काँग्रेसला नाकारले आहे. ओडिशात बिजदशी काँग्रेसचा समझोता नाही.काँग्रेसचे म्हणते की, त्यांची लढत भाजपाशी आहे?काँग्रेसशी भाजपाची कुठेही थेट लढत नाही. काँग्रेस जिवंतच कुठे आहे? दिल्लीपासून ते दक्षिण व कच्छपासून ते नागालँडपर्यंत काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे. त्यामुळे आमची लढत आहे, ती प्रादेशिक पक्षांशीच. ईशान्य भारतात आम्ही स्थानिक पक्षांना हक्क मिळण्याची खात्री दिली. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात समजूतदारपणा दाखविला. त्यामुळे भाजपाची युती अधिक प्रभावी, दूरगामी व परिपक्व आहे.महाराष्ट्रात शिवसेना अडून बसली. उपमुख्यमंत्रीपद मागत आहे?महाराष्ट्रात अडचण नव्हती. पक्षाध्यक्ष अमित शहा युती होईल, हे वारंवार सांगत होते, परंतु माध्यमे त्याला वेगळ्या रंगात दाखवत राहिली. आम्ही नैसर्गिक मित्र आहोत.तुम्ही काँग्रेसला लढतीतून रद्द केले, परंतु प्रियांका गांधींसाठी लोक गर्दी करीत आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना कमी व प्रियांका गांधींच्या सभांना जास्त गर्दी होत आहे, तर त्याचे कारण काय, याचा विचार त्यांनीच करावा.बिहारच्या पाटणा साहिबमधून तुमच्या उमेदवारीची चर्चा आहे.मोदी यांनी ते पंतप्रधान बनल्यापासून सगळ्या नेत्यांना लोकांमध्ये जाऊन काम करण्यास सांगितले. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेत अंतर राहिले नाही. मला आदेश मिळाल्यास मी निवडणूक लढवेन.पाटणा साहिब हा शत्रुघ्न सिन्हा यांचा तो मतदारसंघ आहे.मी आधीही कधी शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल काही बोललो नाही. आताही बोलणार नाही. एवढे म्हणेन की, मी पक्षादेश पाळेन.पंतप्रधान महाराष्ट्रातील असेल, नितीन गडकरी यांचे नाव नाव आहे, याविषयी काय?प्रसारमाध्यमे काहीही अंदाज करू शकतात, परंतु भाजपाबद्दल बोलायचे तर जागा कमी असो की जास्त, नरेंंद्र मोदी पंतप्रधान आहेत व राहतील. नितीन गडकरी यांनी मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही, हे स्पष्ट केले आहेया निवडणुकीत मुद्दा काय असेल? राफेल, बेरोजगारी?या निवडणुकीत एकच मुद्दा आहे व तो नरेंद मोदी. त्यांच्यासमोर इतर सगळे मुद्दे शून्य ठरतात.राफेलबाबत... सर्व आरोप सर्वोच्च न्यायालय आणि कॅगने चुकीचे ठरवले, परंतु कोणी खोट्याला खरे ठरवू पाहात असेल, तर काय करणार? राहुल गांधींनी हे लक्षात घ्यावे की, जनतेचा आशीर्वाद नरेंद्र मोदी यांना आहे.रोजगाराबाबत... डिजिटल इकॉनॉमी व आयटी क्षेत्रात आठ लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण झाल्या. कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे लाखो रोजगार उपलब्ध झाले. ही आकडेवारी आमची नाही, तर उद्योगांनीच दिली आहे.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक