शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

ओबीसींना जोडण्याचा भाजपचा प्रयत्न, मंगळवारी होणार खासदारांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 10:57 IST

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह देशात १२ पेक्षा अधिक राज्ये अशी आहेत, जेथे ओबीसींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे किंवा तेथे निर्णायक मते ओबीसींची आहेत, असेच म्हणावे लागेल.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस व विरोधकांच्या हल्ल्यापासून निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टी मागास वर्गाच्या अपमानाचे कार्ड खेळत आहेत. २८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात भाजपच्या सर्व ओबीसी खासदारांची बैठक बोलावली आहे.

राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्याच्या मुद्द्यावरील काँग्रेस पक्ष व विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून भाजप नेत्यांनी काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत विचारमंथन केले. त्यानंतर संपूर्ण प्रकरण ओबीसींचा अपमान, मागास वर्गाच्या सन्मानाच्या मुद्द्याशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी वर्गात हा संदेश देण्यात येणार आहे की, नरेंद्र मोदी त्यांच्यातील व्यक्ती आहेत.

मोदींवरील हल्ला हा मागास वर्गाच्या जातींवरचा हल्ला आहे. ओबीसींच्या निमित्ताने देशातील अर्धी लोकसंख्या थेट नरेंद्र मोदींना जोडण्याचा यानिमित्ताने प्रयत्न केला जाणार आहे. राहुल गांधींच्या निमित्ताने का होईना भाजपने २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर यानिमित्ताने नजर ठेवली आहे. त्यानंतर आज दिवसभर भाजपच्या मागास वर्गाच्या नेत्यांची वक्तव्ये आली व राहुल गांधी यांनी आपल्या वकत्व्यावरून देशातील सर्व ओबीसींची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. 

देशभरात कार्यक्रमदेशातील एकूण मतदारांच्या ५५ टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसी मतदार आहेत. काही राज्यांत तर ७० टक्के लोकसंख्या ओबीसी आहे. राहुल गांधींच्या निमित्ताने या सर्वांत मोठ्या ओबीसी लोकसंख्येला जोडण्याचे भाजप व नरेंद्र मोदींचे लक्ष्य आहे. याचमुळे भाजप ओबीसी नेत्यांचे देशभरात कार्यक्रम आयोजित करीत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह देशात १२ पेक्षा अधिक राज्ये अशी आहेत, जेथे ओबीसींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे किंवा तेथे निर्णायक मते ओबीसींची आहेत, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :BJPभाजपा