शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

मित्रांनी साथ सोडल्याने भाजपची चिंता वाढली; शिवसेना वगळता मोठा पक्ष मदतीला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 05:35 IST

यामुळे भाजप नेतृत्व विविध राज्यांमध्ये आणखी मित्रपक्ष जोडण्यास उत्सुक आहे.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९ मित्रपक्षांसह ३५२ जागा जिंकल्या होत्या. आता लोकसभा निवडणुका केवळ ११ महिन्यांवर आलेल्या असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वगळता एनडीएमध्ये कोणताही मोठा प्रादेशिक पक्ष उरलेला नाही. यामुळे भाजप नेतृत्व विविध राज्यांमध्ये आणखी मित्रपक्ष जोडण्यास उत्सुक आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये लहान पक्षांना बरोबर घेण्याचे आणि जनता दल (यू)मध्ये फूट पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बिहारमध्ये जद(यू), काँग्रेस आणि राजदच्या नेत्यांनाही भाजप आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. जद(यू) आणि एलजेपीच्या सहकार्याने भाजपने २०१९ मध्ये बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या.

आंध्र प्रदेशात टीडीपी आणि जन सेना पार्टीचे पवन कल्याण यांच्यासोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून, तेथे काही जागा जिंकण्याची आशा आहे. कर्नाटकमधील अपमानास्पद पराभवानंतर राज्यात जद(एस)चे नेते एच. डी. देवेगौडा यांच्याशी लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करण्याची तयारी सुरू आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल (बादल)बाबत स्थिती अद्याप स्पष्ट व्हायची आहे. भाजपच्या या जुन्या मित्रपक्षाने शेतकरी कायद्यांच्या मुद्द्यांवरून २०२०मध्ये साथ सोडली होती.

२५वा वर्धापन दिन आला आणि गेला

भाजपने १५ मे रोजी एनडीएचा २५वा वर्धापन दिन साजरा केला असता. परंतु तो दिवस आला तसा गाजावाजा न करता गेला; कारण एनडीएमध्ये कोणतेही मोठे पक्ष उरले नाहीत. हरयाणातही भाजपपुढे अडचण निर्माण झाली आहे. तेथे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपला पक्ष जेजेपीसाठी लोकसभेच्या चार जागा मागितल्या आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा