शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'भाजपा गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 17:54 IST

चंदिगडमधील युटी गेस्ट हाऊसमध्ये भाजपाच्या आमदारांची बैठक झाली.

चंदीगड : हरयाणा विधानसभेत भाजपाने बहुमत मिळवत जननायक जनता पार्टीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सिरसा मतदारसंघातून निवडून आलेले हरयाणा लोकहित पार्टीचे आमदार गोपाळ कांडा यांचे समर्थन भाजपाने नाकारले आहे. 

हरयाणात भाजपाची सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगडमध्ये केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद दाखल असून त्यांनी भाजपाच्या आमदारांची बैठक बोलाविली होती. यावेळी भाजपा हरयाणा लोकहित पार्टीचे आमदार गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.       

चंदिगडमधील युटी गेस्ट हाऊसमध्ये भाजपाच्या आमदारांची बैठक झाली. यावेळी मनोहर लाल खट्टर यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर मनोहर लाल खट्टर यांना राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याशी चर्चा करून हरयाणात सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदी मनोहरलाल खट्टर हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मनोहरलाल खट्टर उद्या दुपारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

आम्ही कांडाचा पाठिंबा घेत नाही - विजहरयाणाचे मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल विज यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले की, 'आम्ही गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेत नाही. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील करण्याचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही.' 

गोपाळ कांडांनी दिला होता बिनशर्त पाठिंबाहरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गोपाळ कांडा आणि इतर सहा अपक्ष आमदारांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी शुक्रवारी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गोपाळ कांडा यांच्यावर एअर होस्टेसला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गोपाळ कांडा यांचा पाठिंबा घेण्यावर विरोधकच नाही तर भाजपानेही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, सोशल मीडियावरील विरोध पाहता भाजपा गोपाळ कांडा यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे.

गोपाळ कांडा यांच्यावर आरोप 2012 मध्ये एअर होस्टेस गीतिका शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच, बलात्काराचा आरोप गोपाळ कांडा यांच्यावर ठेवण्यात आला होता. एक वर्ष तुरुंगात काढल्यानंतर गोपाळ कांडांची जामिनावर सुटका झाली. गोपाळ कांडा यांच्यावरील गंभीर आरोपामुळे देशभर त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली होती. गोपाळ कांडा यांच्याविरोधात आंदोलन करण्यात भाजपाचाही सहभाग होता. त्याच गोपाळ कांडा यांचा हरयाणामध्ये सत्तेसाठी पाठिंबा घेण्याचे संकेत भाजपाने दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली होती.  

टॅग्स :HaryanaहरयाणाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादBJPभाजपा