शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

भाजपा १६० वर जाणार नाही : दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:55 IST

यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : देशाच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती हे उत्तर प्रदेश व बिहारमधल्या १२० जागा ठरवतात. भाजपा व अपना दलाला २०१४ साली उत्तर प्रदेशात ७३, तर बिहारमध्ये एनडीएला ३१ जागा म्हणजे एकूण १२० पैकी १०४ जागा मिळाल्या. आता ही स्थिती कायम राहणार नाही हे भाजपाही मान्य करते. यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल. काश्मीर, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतही भाजपाच्या जागा घटणारच आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष केंद्रीय सत्तेबरोबर राहतात. प.बंगाल, ओडिशा व दक्षिण भारतातल्या ४ राज्यांत भाजपाचे स्थान नगण्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला १६० ते १७० च्या आसपास व काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळतील, असा सर्वांचाच अंदाज आहे. काँग्रेसच्या जागा १०० पेक्षा किती वाढतील याचे आज भाकीत करणे कठीण आहे. मोदी व शहांना सर्वाधिक भीती काँग्रेस व राहुल गांधींची वाटते हे मात्र स्पष्ट आहे.देशाला अन् भाजपमध्येही अनेकांना मोदी नको आहेत. पद अन् सत्तेसाठी मोदी कोणत्या थराला जातील, याचा नेम नाही. देशात धार्मिक व जातीय विद्वेषाची बीजे तर पेरलीच आहेत. त्याचा भडका उडवण्याचा प्रयत्न निवडणुकीपूर्वी होईल.पाकिस्तानच्या विरोधातही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे; पण रिझर्व बँक, नीती आयोग या घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा मोदींनी धुळीला मिळवली आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे लघु उद्योग, लहान व्यापारी व शेतकऱ्यांची सरकारने पिळवणूक केली. देशात सर्वत्र असंतोषाचा भडका उडण्याची कारणे अनेक आहेत.स्वस्थ बसून चालणार नाहीडिजिटल इंडियाचा जगभर गाजावाजा सुरू असताना, इतकी साधी मागणी निवडणूक आयोग पूर्ण करू शकत नसेल, तर स्वाभाविकपणे आगामी निवडणुकीबाबतच अनेक शंका उत्पन्न होतात. आयोगाच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही. मात्र, रास्त शंकांचे योग्यप्रकारे निरसन होत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांनीही स्वस्थ बसून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंह