शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

भाजपा १६० वर जाणार नाही : दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:55 IST

यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : देशाच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती हे उत्तर प्रदेश व बिहारमधल्या १२० जागा ठरवतात. भाजपा व अपना दलाला २०१४ साली उत्तर प्रदेशात ७३, तर बिहारमध्ये एनडीएला ३१ जागा म्हणजे एकूण १२० पैकी १०४ जागा मिळाल्या. आता ही स्थिती कायम राहणार नाही हे भाजपाही मान्य करते. यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल. काश्मीर, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतही भाजपाच्या जागा घटणारच आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष केंद्रीय सत्तेबरोबर राहतात. प.बंगाल, ओडिशा व दक्षिण भारतातल्या ४ राज्यांत भाजपाचे स्थान नगण्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला १६० ते १७० च्या आसपास व काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळतील, असा सर्वांचाच अंदाज आहे. काँग्रेसच्या जागा १०० पेक्षा किती वाढतील याचे आज भाकीत करणे कठीण आहे. मोदी व शहांना सर्वाधिक भीती काँग्रेस व राहुल गांधींची वाटते हे मात्र स्पष्ट आहे.देशाला अन् भाजपमध्येही अनेकांना मोदी नको आहेत. पद अन् सत्तेसाठी मोदी कोणत्या थराला जातील, याचा नेम नाही. देशात धार्मिक व जातीय विद्वेषाची बीजे तर पेरलीच आहेत. त्याचा भडका उडवण्याचा प्रयत्न निवडणुकीपूर्वी होईल.पाकिस्तानच्या विरोधातही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे; पण रिझर्व बँक, नीती आयोग या घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा मोदींनी धुळीला मिळवली आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे लघु उद्योग, लहान व्यापारी व शेतकऱ्यांची सरकारने पिळवणूक केली. देशात सर्वत्र असंतोषाचा भडका उडण्याची कारणे अनेक आहेत.स्वस्थ बसून चालणार नाहीडिजिटल इंडियाचा जगभर गाजावाजा सुरू असताना, इतकी साधी मागणी निवडणूक आयोग पूर्ण करू शकत नसेल, तर स्वाभाविकपणे आगामी निवडणुकीबाबतच अनेक शंका उत्पन्न होतात. आयोगाच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही. मात्र, रास्त शंकांचे योग्यप्रकारे निरसन होत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांनीही स्वस्थ बसून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंह