शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा १६० वर जाणार नाही : दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:55 IST

यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : देशाच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती हे उत्तर प्रदेश व बिहारमधल्या १२० जागा ठरवतात. भाजपा व अपना दलाला २०१४ साली उत्तर प्रदेशात ७३, तर बिहारमध्ये एनडीएला ३१ जागा म्हणजे एकूण १२० पैकी १०४ जागा मिळाल्या. आता ही स्थिती कायम राहणार नाही हे भाजपाही मान्य करते. यूपीमध्ये सपा, बसपा व रालोद यांची आघाडी आहे. त्यात काँग्रेसचा समावेश झाल्यास भाजपाला १५ जागांवर समाधान मानावे लागेल. बिहारमध्ये राजद व काँग्रेसची आघाडी भाजपा जद(यू)ला जोरदार लढत देईल. काश्मीर, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतही भाजपाच्या जागा घटणारच आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष केंद्रीय सत्तेबरोबर राहतात. प.बंगाल, ओडिशा व दक्षिण भारतातल्या ४ राज्यांत भाजपाचे स्थान नगण्य आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला १६० ते १७० च्या आसपास व काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळतील, असा सर्वांचाच अंदाज आहे. काँग्रेसच्या जागा १०० पेक्षा किती वाढतील याचे आज भाकीत करणे कठीण आहे. मोदी व शहांना सर्वाधिक भीती काँग्रेस व राहुल गांधींची वाटते हे मात्र स्पष्ट आहे.देशाला अन् भाजपमध्येही अनेकांना मोदी नको आहेत. पद अन् सत्तेसाठी मोदी कोणत्या थराला जातील, याचा नेम नाही. देशात धार्मिक व जातीय विद्वेषाची बीजे तर पेरलीच आहेत. त्याचा भडका उडवण्याचा प्रयत्न निवडणुकीपूर्वी होईल.पाकिस्तानच्या विरोधातही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे; पण रिझर्व बँक, नीती आयोग या घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा मोदींनी धुळीला मिळवली आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे लघु उद्योग, लहान व्यापारी व शेतकऱ्यांची सरकारने पिळवणूक केली. देशात सर्वत्र असंतोषाचा भडका उडण्याची कारणे अनेक आहेत.स्वस्थ बसून चालणार नाहीडिजिटल इंडियाचा जगभर गाजावाजा सुरू असताना, इतकी साधी मागणी निवडणूक आयोग पूर्ण करू शकत नसेल, तर स्वाभाविकपणे आगामी निवडणुकीबाबतच अनेक शंका उत्पन्न होतात. आयोगाच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही. मात्र, रास्त शंकांचे योग्यप्रकारे निरसन होत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांनीही स्वस्थ बसून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंह