शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal: भाजपमधील कलह वाढला! दिलीप घोष यांना कार्यकर्त्यांनी घेरले; बैठकीत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 11:46 IST

West Bengal: भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.

हुगली:पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर आता भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालून त्यांच्याविरोधात निदर्शने केली. (bjp west bengal chief dilip ghosh faced protest of party workers)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हुगली येथील चुचुरा भागात बुथ लेवल कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालत निदर्शने केली. हुगली जिल्हा समिती बरखास्त करावी आणि जिल्हाध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. 

गुजरातमध्ये १५ जूनपासून लागू होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा

पक्षाच्या शिस्तीबाबत तडजोड नाही

या विरोध प्रदर्शनाबाबत बोलताना हुगली येथून खासदार असलेले लॉकेट चॅटर्जी यांनी सांगितले की, भाजपमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नेते तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोध तक्रारही करण्याला विरोध नाही. त्यासाठी कार्यकर्ते स्वतंत्र आहेत. मात्र, पक्षाचे काही नियम आहेत. पक्षाच्या शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे चॅटर्जी यांनी स्पष्ट केले. तसेच यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा दावा केला. 

तृणमूल काँग्रेसवर केले आरोप

तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सामीन होऊन गोंधळ घालायला सुरुवात केली, असा दावा लॉकेट चॅटर्जी यांनी केला आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात आला असून, दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे. लॉकेट चॅटर्जी आणि दिलीप घोष यांनी आधी पक्ष सांभाळावा आणि मगच इतरांना सल्ले द्यावेत, असा पलटवार तृणमूल काँग्रेस  हुगलीच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होते. मात्र तृणमूलने तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी लागण्याची चिन्हे आहेत. भाजपचे ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपला मोठे भगदाड पडू शकते, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाPoliticsराजकारण