शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

दिल्लीत दारुण पराभव...! AAP कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले गेले; कोणालाच 'प्रवेश' नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:39 IST

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी काही तो विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव आपला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयात चित्र दिसत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारुण पराभव होताना दिसत आहे. सेनापती, मंत्री सारे गारद झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी काही तो विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव आपला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयात चित्र दिसत आहे.

अण्णा हजारेंची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, केजरीवालांना या गोष्टीने बुडविले...

आपच्या मुख्यालयाचे मुख्य गेट आतून बंद करण्यात आले आहे. कोणालाच प्रवेश दिला जात नाहीय. या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला देखील आतमध्ये घेतलेले नाहीय. तिला आतमध्ये घेण्यासाठी कार्यकर्ते फोनाफोनी करताना दिसत आहेत. सुरुवातीच्या कलांत आप मागे पडल्याचे दिसताच आपच्या कार्यालयात शुकशुकाट पसरलेला होता. आता केजरीवाल पराभवाच्या छायेत असल्याचे समजल्यानंतर गेटच बंद करून घेण्यात आले आहे.

आपच्या वरिष्ठ पातळीवरचे बहुतांश सर्व नेते पराभूत झाले आहेत. भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना 3186 मतांनी पराभूत केले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून सुमारे ६०० मतांनी पराभूत झाले आहेत. राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे. 

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी कमाल केली, अमित शाह यांची भविष्यवाणी खरी ठरली

केजरीवालच कारण...

केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून केली. मेट्रोने प्रवास करणे, स्वस्त गाडीने प्रवास करणे, सुरक्षा घेण्यास नकार देणे, या सर्व गोष्टींमुळे ते अन्य राजकारणी लोकांपेक्षा वेगळे ठरले होते. पण लवकरच ही प्रतिमा नाहीशी होऊ लागली. त्यांच्या ४० कोटी रुपयांच्या सरकारी बंगल्यावरील वादामुळे त्यांच्या साध्या राहणीमानाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. जनतेने त्यांना स्वतःचा नेता म्हणून निवडले होते पण त्यांची व्हीव्हीआयपी जीवनशैली पाहिल्यानंतर जनतेला स्वतःची फसवणूक झाल्याचे आढळले. त्यात दारु घोटाळ्यात तुरुंगात जाणे, भाजपविरोधात छोट्या छोट्या गोष्टींवरून राजकारण करत राहणे, या गोष्टींना जनता कंटाळली होती. याचाच परिणाम आपच्या आणि त्यांच्या पराभवात रुपांतरीत झाला. 

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल