शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

दिल्लीत दारुण पराभव...! AAP कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले गेले; कोणालाच 'प्रवेश' नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:39 IST

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी काही तो विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव आपला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयात चित्र दिसत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारुण पराभव होताना दिसत आहे. सेनापती, मंत्री सारे गारद झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. सिसोदियांचा पराभव झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी काही तो विजय प्राप्त केला आहे. अशातच हा पराभव आपला सहन झालेला दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष मुख्यालयात चित्र दिसत आहे.

अण्णा हजारेंची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, केजरीवालांना या गोष्टीने बुडविले...

आपच्या मुख्यालयाचे मुख्य गेट आतून बंद करण्यात आले आहे. कोणालाच प्रवेश दिला जात नाहीय. या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला देखील आतमध्ये घेतलेले नाहीय. तिला आतमध्ये घेण्यासाठी कार्यकर्ते फोनाफोनी करताना दिसत आहेत. सुरुवातीच्या कलांत आप मागे पडल्याचे दिसताच आपच्या कार्यालयात शुकशुकाट पसरलेला होता. आता केजरीवाल पराभवाच्या छायेत असल्याचे समजल्यानंतर गेटच बंद करून घेण्यात आले आहे.

आपच्या वरिष्ठ पातळीवरचे बहुतांश सर्व नेते पराभूत झाले आहेत. भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना 3186 मतांनी पराभूत केले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून सुमारे ६०० मतांनी पराभूत झाले आहेत. राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे. 

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी कमाल केली, अमित शाह यांची भविष्यवाणी खरी ठरली

केजरीवालच कारण...

केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून केली. मेट्रोने प्रवास करणे, स्वस्त गाडीने प्रवास करणे, सुरक्षा घेण्यास नकार देणे, या सर्व गोष्टींमुळे ते अन्य राजकारणी लोकांपेक्षा वेगळे ठरले होते. पण लवकरच ही प्रतिमा नाहीशी होऊ लागली. त्यांच्या ४० कोटी रुपयांच्या सरकारी बंगल्यावरील वादामुळे त्यांच्या साध्या राहणीमानाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. जनतेने त्यांना स्वतःचा नेता म्हणून निवडले होते पण त्यांची व्हीव्हीआयपी जीवनशैली पाहिल्यानंतर जनतेला स्वतःची फसवणूक झाल्याचे आढळले. त्यात दारु घोटाळ्यात तुरुंगात जाणे, भाजपविरोधात छोट्या छोट्या गोष्टींवरून राजकारण करत राहणे, या गोष्टींना जनता कंटाळली होती. याचाच परिणाम आपच्या आणि त्यांच्या पराभवात रुपांतरीत झाला. 

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल