शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा वापर : तृणमूल काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 12:26 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बंगामधील हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. या सर्व घटनांची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीरपणे दखल घेतली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल काँग्रेसचा वाद देवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले पार्थ चटर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक दावा चटर्जी यांनी केला आहे. पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये जेव्हा लहान मुलांना आणि यादव समुदायाचा लोकांना मारले गेले त्यावेळी भाजप नेते कुठे होते. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडवून , तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्याच्या घटना भाजपकडून घडवून आणल्या जात असल्याचा गंभीर आरोप चटर्जी यांनी केला आहे. भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा पुरेपूर वापर केला जात असल्याचे ही चटर्जी म्हणाले. दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांना पश्चिम बंगालमधील परिस्थिती कळणार नाही असेही चटर्जी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बंगामधील हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. या सर्व घटनांची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीरपणे दखल घेतली आहे. तर दुसरीकडे आज पश्चिम बंगालमध्ये भाजप काळा दिवस पाळणार असून १२ तास बंदची  हाक देण्यात आली आहे.