शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"भाजपने नुपूर शर्मावर कारवाई केली, आता गोंधळ घालण्याची काय गरज?': नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:19 IST

''नुपूर शर्मावर भाजपने कारवाई केली आहे, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण, काहीजण जाणूनबुजून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत."

पाटणा: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे देशासह विदेशातही गदारोळ सुरू आहे. याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. "भाजपने नुपूर शर्मावर कारवाई केली आहे, मग आता एवढा गदारोळ करण्याची काय गरज आहे?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

माध्यमांशी संवाद साधताना नितीश कुमार म्हणाले, "नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने आधीच कारवाई केली आहे. नुपूर शर्मावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. असे असूनही, हिंसक घटना होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. काही लोकांना जाणूनबुजून आपापसात भांडण लावायचे आहेत. कोणतीही गोष्ट नैसर्गिक होत नसते, त्यामागे कोणीतरी सूत्रधार असतो," असे ते म्हणाले.

'बिहारमध्ये कोणताही वाद नाही'नितीश कुमार पुढे म्हणाले की, देशभरात सुरू असलेल्या वादाचे बिहारमध्ये पडसाद नाहीत. बिहारमध्ये कोणत्याही वादाचे वातावरण नाही. रांची हिंसाचाराच्या वेळी बिहार सरकारचे मंत्री नितीन नवीन यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि आवश्यक कारवाई करण्याची जबाबदारी झारखंड सरकारची आहे. बिहार सरकारने हा मुद्दा तातडीने झारखंड सरकारकडे मांडला आहे, असेही ते म्हणाले.

अनेक शहरांमध्ये हिंसाचारनुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य केले होते, यानंतर बराच वाद झाला. अरब देशांनीही नुपूरच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, शुक्रवारी दिल्ली, रांची, लखनौ, प्रयागराज, कोलकाता येथे नूपूर शर्माविरोधात निदर्शने झाली. निदर्शनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला. सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली. रांची येथील हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीतील जामा मशिदीसमोर घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे, यूपीच्या प्रयागराजमध्ये हिंसाचार उग्रपणे पसरला. येथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारMosqueमशिद