शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; मुख्यमंत्र्यांची मोदींवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 10:02 IST

देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले. 

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांकडून काँग्रेसच्या वारशावर  हल्लाबोल करण्यात येतो. पण इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी जहरी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या 135 व्या स्थापना दिनी शहिद स्मारकाच्या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षातील लोक पंडित नेहरूंच्या वारश्याविषयी बोलत असतात. पंडित नेहरूंनी आम्हाला त्यागाचा, बलिदानाचा आणि वेळप्रसंगी कारागृहात जाण्याचा वारसा दिला आहे. देशासाठी बलिदान देण्याचा वारसा आहे. राजीव गांधी यांनी बलिदान दिले तो देखील वारसा होता. मात्र तुमच्या पक्षाच्या विचारधारेचे लोक इंग्रजांसाठी खबऱ्यांच काम करत होते. असे लोक काँग्रेसच्या विरासतीच्या गप्पा मारत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे गेहलोत म्हणाले. 

आमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. काँग्रेस पक्षाला पाहता पाहता 135 वर्षे झाल्याचे सांगताना गेहलोत म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा दहा वर्षांचा काळ सर्वांना ठावूक आहे. तो काळ अधिकारांचा होता. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगार अधिकार, मनरेगा, अन्नसुरक्षा कायदा हे छोटे निर्णय नव्हते, असंही गेहलोत यांनी सांगितले. 

दरम्यान देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले.