शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; मुख्यमंत्र्यांची मोदींवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 10:02 IST

देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले. 

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांकडून काँग्रेसच्या वारशावर  हल्लाबोल करण्यात येतो. पण इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी जहरी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या 135 व्या स्थापना दिनी शहिद स्मारकाच्या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षातील लोक पंडित नेहरूंच्या वारश्याविषयी बोलत असतात. पंडित नेहरूंनी आम्हाला त्यागाचा, बलिदानाचा आणि वेळप्रसंगी कारागृहात जाण्याचा वारसा दिला आहे. देशासाठी बलिदान देण्याचा वारसा आहे. राजीव गांधी यांनी बलिदान दिले तो देखील वारसा होता. मात्र तुमच्या पक्षाच्या विचारधारेचे लोक इंग्रजांसाठी खबऱ्यांच काम करत होते. असे लोक काँग्रेसच्या विरासतीच्या गप्पा मारत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे गेहलोत म्हणाले. 

आमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. काँग्रेस पक्षाला पाहता पाहता 135 वर्षे झाल्याचे सांगताना गेहलोत म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा दहा वर्षांचा काळ सर्वांना ठावूक आहे. तो काळ अधिकारांचा होता. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगार अधिकार, मनरेगा, अन्नसुरक्षा कायदा हे छोटे निर्णय नव्हते, असंही गेहलोत यांनी सांगितले. 

दरम्यान देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले.