शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये क्षीरसागरांकडे धनुष्यबाण; निशान्यावर भाजप की राष्ट्रवादी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 13:07 IST

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे.

मुंबई - मागील पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला आजअखेर मुहूर्त मिळाला. हा मंत्रीमंडळविस्तार विकासाच्या दृष्टीने कमी आणि पक्षाची कमकुवत बाजू मजबूत करण्यासाठीच सर्वाधिक असल्याचे दिसून येते. या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदे आली. मात्र ही मंत्रीपदे बाहेरून आलेल्या नेत्यांनाच मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे निष्ठावंत नेते बाजुला पडल्याची चर्चा रंगत आहे.

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे. अर्थात जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद दिल्याने जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार आहे. त्याचवेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादीला हा एक इशारा मानला जात आहे.

बीड जिल्ह्यावर मुंडे कुटुंबियांची पकड आहे. एक मुंडे भाजप तर दुसरे मुंडे राष्ट्रवादीत आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे भाजपचा गड सांभाळतात तर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशीच लढत होती. आता जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत आल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. तर दोन कॅबिनेटमंत्रीपदे मिळाल्यामुळे बीड जिल्ह्याला देखील फायदाच होणार आहे.

बीडमध्ये भाजपचे पाच आमदार असून जयदत्त क्षीरसागर हे एकमेव राष्ट्रवादीचं प्रतिनिधीत्व करत होते. मात्र तेच शिवसेनेत दाखल झाल्याने बीडमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये अनेक वर्षांची युती तोडून भाजप-शिवसेना स्वबळावर लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास, शिवसेनेकडून ही पर्यायी व्यवस्था मानली जात आहे.