शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बीडमध्ये क्षीरसागरांकडे धनुष्यबाण; निशान्यावर भाजप की राष्ट्रवादी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 13:07 IST

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे.

मुंबई - मागील पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला आजअखेर मुहूर्त मिळाला. हा मंत्रीमंडळविस्तार विकासाच्या दृष्टीने कमी आणि पक्षाची कमकुवत बाजू मजबूत करण्यासाठीच सर्वाधिक असल्याचे दिसून येते. या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदे आली. मात्र ही मंत्रीपदे बाहेरून आलेल्या नेत्यांनाच मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे निष्ठावंत नेते बाजुला पडल्याची चर्चा रंगत आहे.

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे. अर्थात जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद दिल्याने जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार आहे. त्याचवेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादीला हा एक इशारा मानला जात आहे.

बीड जिल्ह्यावर मुंडे कुटुंबियांची पकड आहे. एक मुंडे भाजप तर दुसरे मुंडे राष्ट्रवादीत आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे भाजपचा गड सांभाळतात तर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशीच लढत होती. आता जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत आल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. तर दोन कॅबिनेटमंत्रीपदे मिळाल्यामुळे बीड जिल्ह्याला देखील फायदाच होणार आहे.

बीडमध्ये भाजपचे पाच आमदार असून जयदत्त क्षीरसागर हे एकमेव राष्ट्रवादीचं प्रतिनिधीत्व करत होते. मात्र तेच शिवसेनेत दाखल झाल्याने बीडमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये अनेक वर्षांची युती तोडून भाजप-शिवसेना स्वबळावर लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास, शिवसेनेकडून ही पर्यायी व्यवस्था मानली जात आहे.