शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बीडमध्ये क्षीरसागरांकडे धनुष्यबाण; निशान्यावर भाजप की राष्ट्रवादी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 13:07 IST

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे.

मुंबई - मागील पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला आजअखेर मुहूर्त मिळाला. हा मंत्रीमंडळविस्तार विकासाच्या दृष्टीने कमी आणि पक्षाची कमकुवत बाजू मजबूत करण्यासाठीच सर्वाधिक असल्याचे दिसून येते. या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदे आली. मात्र ही मंत्रीपदे बाहेरून आलेल्या नेत्यांनाच मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे निष्ठावंत नेते बाजुला पडल्याची चर्चा रंगत आहे.

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे. अर्थात जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद दिल्याने जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार आहे. त्याचवेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादीला हा एक इशारा मानला जात आहे.

बीड जिल्ह्यावर मुंडे कुटुंबियांची पकड आहे. एक मुंडे भाजप तर दुसरे मुंडे राष्ट्रवादीत आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे भाजपचा गड सांभाळतात तर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशीच लढत होती. आता जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत आल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. तर दोन कॅबिनेटमंत्रीपदे मिळाल्यामुळे बीड जिल्ह्याला देखील फायदाच होणार आहे.

बीडमध्ये भाजपचे पाच आमदार असून जयदत्त क्षीरसागर हे एकमेव राष्ट्रवादीचं प्रतिनिधीत्व करत होते. मात्र तेच शिवसेनेत दाखल झाल्याने बीडमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये अनेक वर्षांची युती तोडून भाजप-शिवसेना स्वबळावर लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास, शिवसेनेकडून ही पर्यायी व्यवस्था मानली जात आहे.