शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बीडमध्ये क्षीरसागरांकडे धनुष्यबाण; निशान्यावर भाजप की राष्ट्रवादी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 13:07 IST

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे.

मुंबई - मागील पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला आजअखेर मुहूर्त मिळाला. हा मंत्रीमंडळविस्तार विकासाच्या दृष्टीने कमी आणि पक्षाची कमकुवत बाजू मजबूत करण्यासाठीच सर्वाधिक असल्याचे दिसून येते. या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदे आली. मात्र ही मंत्रीपदे बाहेरून आलेल्या नेत्यांनाच मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे निष्ठावंत नेते बाजुला पडल्याची चर्चा रंगत आहे.

नुकतेच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेते दाखल झालेले बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे एकेकाळचा राष्ट्रवादीचा आणि आता भाजपचा गड झालेल्या बीडमध्ये शिवसेनेचा मजबूत होऊ पाहात आहे. अर्थात जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद दिल्याने जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार आहे. त्याचवेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादीला हा एक इशारा मानला जात आहे.

बीड जिल्ह्यावर मुंडे कुटुंबियांची पकड आहे. एक मुंडे भाजप तर दुसरे मुंडे राष्ट्रवादीत आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे भाजपचा गड सांभाळतात तर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशीच लढत होती. आता जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत आल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. तर दोन कॅबिनेटमंत्रीपदे मिळाल्यामुळे बीड जिल्ह्याला देखील फायदाच होणार आहे.

बीडमध्ये भाजपचे पाच आमदार असून जयदत्त क्षीरसागर हे एकमेव राष्ट्रवादीचं प्रतिनिधीत्व करत होते. मात्र तेच शिवसेनेत दाखल झाल्याने बीडमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये अनेक वर्षांची युती तोडून भाजप-शिवसेना स्वबळावर लढले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास, शिवसेनेकडून ही पर्यायी व्यवस्था मानली जात आहे.