शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

शिवसेना, राष्ट्रवादीचे १२-१६ खासदार भाजपाच्या गळाला?; राज्यातील भाजपा नेत्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 11:32 IST

काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नेत्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त नेमका कधी ठरणार ? याबद्दलची चर्चाही ऐकायला मिळते आहे. असं असताना मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई, दि. 13- काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या नेत्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त नेमका कधी ठरणार ? याबद्दलची चर्चाही ऐकायला मिळते आहे. असं असताना मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील १२ ते १६ खासदार भाजपाच्या गळाला लागले असल्याचा दावा राज्यातील भाजपा नेत्यांनी केला आहे. त्यातील अनेक खासदारांची भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिलं आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. देशात ‘भाजपामध्ये आपलं स्वागत आहे’ असं खुलं निमंत्रणही भाजपाच्या नेत्यांकडून इतर पक्षांच्या खासदारांना दिलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा नेते चर्चेतील नेत्यांचं स्वागतही करताना दिसत आहेत. इतर पक्षात नाखुशअसलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांसाठी भाजपाचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असं एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे.

पक्ष किंवा नेतृत्वावर जे लोक नाखूश आहेत. ज्यांना भाजपात प्रवेश करण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी भाजपाची दारं नेहमी खुली आहेत, असं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्यात एक बैठकही झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं. राज्यातील इतर पक्षांच्या जवळपास १५ आमदारांची भाजपाशी बोलणी सुरू आहेत, असा दावा पक्षाचे सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे नेते सारंग कामटेकर यांनी केला आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत, असंही ते म्हणाले. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांचे १२ ते १६ खासदार भाजपाच्या गळाला लागल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल, असं राजकीय विश्लेषक माधव सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. राज्यातील ४८ पैकी ३५ जागांवर शिवसेना उमेदवार उभे करण्यात येतील, असं नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यात युती झाल्यास २५ पेक्षा जास्त जागा शिवसेनेसाठी सोडणार नसल्याचे भाजपाचं म्हणणं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.