शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शिवसेना, राष्ट्रवादीचे १२-१६ खासदार भाजपाच्या गळाला?; राज्यातील भाजपा नेत्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 11:32 IST

काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नेत्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त नेमका कधी ठरणार ? याबद्दलची चर्चाही ऐकायला मिळते आहे. असं असताना मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई, दि. 13- काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या नेत्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त नेमका कधी ठरणार ? याबद्दलची चर्चाही ऐकायला मिळते आहे. असं असताना मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील १२ ते १६ खासदार भाजपाच्या गळाला लागले असल्याचा दावा राज्यातील भाजपा नेत्यांनी केला आहे. त्यातील अनेक खासदारांची भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिलं आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. देशात ‘भाजपामध्ये आपलं स्वागत आहे’ असं खुलं निमंत्रणही भाजपाच्या नेत्यांकडून इतर पक्षांच्या खासदारांना दिलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा नेते चर्चेतील नेत्यांचं स्वागतही करताना दिसत आहेत. इतर पक्षात नाखुशअसलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांसाठी भाजपाचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असं एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे.

पक्ष किंवा नेतृत्वावर जे लोक नाखूश आहेत. ज्यांना भाजपात प्रवेश करण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी भाजपाची दारं नेहमी खुली आहेत, असं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्यात एक बैठकही झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं. राज्यातील इतर पक्षांच्या जवळपास १५ आमदारांची भाजपाशी बोलणी सुरू आहेत, असा दावा पक्षाचे सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे नेते सारंग कामटेकर यांनी केला आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत, असंही ते म्हणाले. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांचे १२ ते १६ खासदार भाजपाच्या गळाला लागल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल, असं राजकीय विश्लेषक माधव सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. राज्यातील ४८ पैकी ३५ जागांवर शिवसेना उमेदवार उभे करण्यात येतील, असं नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यात युती झाल्यास २५ पेक्षा जास्त जागा शिवसेनेसाठी सोडणार नसल्याचे भाजपाचं म्हणणं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.