शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

शिवसेना, राष्ट्रवादीचे १२-१६ खासदार भाजपाच्या गळाला?; राज्यातील भाजपा नेत्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 11:32 IST

काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नेत्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त नेमका कधी ठरणार ? याबद्दलची चर्चाही ऐकायला मिळते आहे. असं असताना मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई, दि. 13- काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या नेत्यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त नेमका कधी ठरणार ? याबद्दलची चर्चाही ऐकायला मिळते आहे. असं असताना मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील १२ ते १६ खासदार भाजपाच्या गळाला लागले असल्याचा दावा राज्यातील भाजपा नेत्यांनी केला आहे. त्यातील अनेक खासदारांची भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिलं आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. देशात ‘भाजपामध्ये आपलं स्वागत आहे’ असं खुलं निमंत्रणही भाजपाच्या नेत्यांकडून इतर पक्षांच्या खासदारांना दिलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा नेते चर्चेतील नेत्यांचं स्वागतही करताना दिसत आहेत. इतर पक्षात नाखुशअसलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांसाठी भाजपाचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असं एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे.

पक्ष किंवा नेतृत्वावर जे लोक नाखूश आहेत. ज्यांना भाजपात प्रवेश करण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी भाजपाची दारं नेहमी खुली आहेत, असं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्यात एक बैठकही झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं. राज्यातील इतर पक्षांच्या जवळपास १५ आमदारांची भाजपाशी बोलणी सुरू आहेत, असा दावा पक्षाचे सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे नेते सारंग कामटेकर यांनी केला आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत, असंही ते म्हणाले. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांचे १२ ते १६ खासदार भाजपाच्या गळाला लागल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल, असं राजकीय विश्लेषक माधव सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. राज्यातील ४८ पैकी ३५ जागांवर शिवसेना उमेदवार उभे करण्यात येतील, असं नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यात युती झाल्यास २५ पेक्षा जास्त जागा शिवसेनेसाठी सोडणार नसल्याचे भाजपाचं म्हणणं आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.