शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भाजपामुळे देश लाजिरवाण्या परिस्थितीत- अरुंधती रॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 18:19 IST

भाजपाने सत्ता मिळवल्यापासून देशाचे केवळ आर्थिकच नाही, तर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तात्त्विक नुकसान झाले

नवी दिल्ली : भाजपाने सत्ता मिळवल्यापासून देशाचे केवळ आर्थिकच नाही, तर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तात्विक नुकसान झाले असून, त्यामुळे देश सध्या लाजिरवाण्या परिस्थितीत असल्याचे सांगत ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी मंगळवारी जंतरमंतरवर आयोजित आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर सडकून टीका केली.तीन वर्षांपूर्वी जेएनयूमधून बेपत्ता झालेला नजीब अहमद या विद्यार्थ्याचा शोध घेण्यात दिल्ली पोलिसांसह सीबीआय आणि एनआयए या सरकारी संस्था अपयशी ठरल्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून जंतरमंतरवर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच नजीबची आई फातिमा नफीस, गौरी लंकेश यांची बहिण कविता लंकेश, मॉब लिंचिंगमध्ये मारले गेलेला तबरेझ अन्सारी याची पत्नी शैस्ता परवीन आणि उत्तर प्रदेशातील हिंसाचारात मारले गेलेले पोलीस अधिकारी सुबोध कुमार यांच्या पत्नी रजनी सिंग यावेळी उपस्थित होत्या.यावेळी रॉय म्हणाल्या की, भाजपच्या काळात आर्थिकदृष्ट्या देश पिछाडीवर गेलेलाच आहे. मात्र, न्यायव्यवस्था, शिक्षण, पत्रकारिता, मानवाधिकार, संरक्षण या सर्वच क्षेत्रात देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हिंदुत्ववादी विचार पसरवण्यासाठी सर्व पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. देशातील सध्याचे वातावरण लाजीरवाणे असून अशावेळी आपला देश महान ठरत नाही. संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला तर भारत पुन्हा महान ठरेल पण सध्याची परिस्थिती भीषण आहे. पुढील काळात हे सरकार राष्ट्रीय नागरिकत्व कायदा लागू करेल, अशी शक्यताही अरुंधती रॉय यांनी व्यक्त केली.

जेएनयूएसयूच्या अध्यक्षा जैशे घोष म्हणाल्या की, वसतीगृहात घुसलेल्या टोळक्याने नजीबला बेदम मारहाण केली. यावेळी सुरक्षा रक्षक उपस्थित असतानाही त्यांनी मध्यस्ती केली नाही. त्यानंतर नजीब बेपत्ता झाला. मात्र, आजपर्यंत नजीबचा शोध लागलेला नाही. सीबीआय, दिल्ली पोलीस यांनी कोणताही शोध घेतलेला नाही. पुढील काळात गृह मंत्रालय, संसदेवर आम्ही मोर्चा नेणार आहोत. यावेळी आंदोलकांनी साथी नजीब को ढुंड के लाओ, आम्मी तुम संघर्ष करो-हम तुम्हारे साथ है, वी वॉन्ट नजीब, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. न्यायासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार असल्याचे सांगताना  नजीबची आई फातिमा यांना यावेळी अश्रू आवरता आले नाहीत.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी