शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 19:56 IST

ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुन्हा एकदा समान नागरी संहितेचा (यूसीसी) मुद्दा उपस्थित केला आहे. ही भाजपची राजकीय खेळी असल्याचे सांगत ममता म्हणाल्या, यूसीसीचा हिंदूंना काहीही फायदा होणार नाही. एवढेच नाही तर, मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत पराभवाच्या भीतीमुळे भाजपने विभाजनाच्या रणनीतीचा सहारा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले.

ममता म्हणाल्या, “जेव्हा-जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा-तेव्हा ते सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी एखादा मुद्दा काढतात. आता ते UCC बद्दल बोलत आहेत आणि प्रचार करत आहेत की हे एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात आहे. मात्र, हे UCC राजकीय विधानांशिवाय काही नाही आणि त्यात हिंदू नाहीत. देशभरात भाजपविरोधी भावना वाढत आहे, जे मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर स्पष्ट झाले आहे."

‘भाजप भयभीत’ - "पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाचा पॅटर्न आणि टक्केवारी पाहता, भाजपचा पराभव झाल्याचे आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो. उर्वरित पाच टप्प्यातही त्यांना पराभवाचाच सामना करावा लागणार आहे. भाजपमध्ये भीती आणि घबराट पसरली आहे," असे ममता म्हणाल्या.

यावेळी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील भाजप नेत्यांवर राज्यात जवळपास 26,000 शालेय नोकऱ्या रद्द करण्यात सहभागी असल्याचा आरोपही केला. त्या म्हणाल्या, “जर कुणी चूक केली असेल तर ती सुधारली जाऊ शकते. मात्र 26,000 नोकऱ्या हिरावणे योग्य नाही. ही भाजपची चाल आहे. ज्या भाजपने आपल्या नोकऱ्या हिरावल्या आहेत, त्या भाजपला मतदान करू नका.”

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारUniform Civil Codeसमान नागरी कायदा