शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 19:56 IST

ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुन्हा एकदा समान नागरी संहितेचा (यूसीसी) मुद्दा उपस्थित केला आहे. ही भाजपची राजकीय खेळी असल्याचे सांगत ममता म्हणाल्या, यूसीसीचा हिंदूंना काहीही फायदा होणार नाही. एवढेच नाही तर, मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत पराभवाच्या भीतीमुळे भाजपने विभाजनाच्या रणनीतीचा सहारा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले.

ममता म्हणाल्या, “जेव्हा-जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा-तेव्हा ते सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी एखादा मुद्दा काढतात. आता ते UCC बद्दल बोलत आहेत आणि प्रचार करत आहेत की हे एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात आहे. मात्र, हे UCC राजकीय विधानांशिवाय काही नाही आणि त्यात हिंदू नाहीत. देशभरात भाजपविरोधी भावना वाढत आहे, जे मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर स्पष्ट झाले आहे."

‘भाजप भयभीत’ - "पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाचा पॅटर्न आणि टक्केवारी पाहता, भाजपचा पराभव झाल्याचे आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो. उर्वरित पाच टप्प्यातही त्यांना पराभवाचाच सामना करावा लागणार आहे. भाजपमध्ये भीती आणि घबराट पसरली आहे," असे ममता म्हणाल्या.

यावेळी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील भाजप नेत्यांवर राज्यात जवळपास 26,000 शालेय नोकऱ्या रद्द करण्यात सहभागी असल्याचा आरोपही केला. त्या म्हणाल्या, “जर कुणी चूक केली असेल तर ती सुधारली जाऊ शकते. मात्र 26,000 नोकऱ्या हिरावणे योग्य नाही. ही भाजपची चाल आहे. ज्या भाजपने आपल्या नोकऱ्या हिरावल्या आहेत, त्या भाजपला मतदान करू नका.”

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारUniform Civil Codeसमान नागरी कायदा