शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

'राहुल गांधी कुठं जातात?', गोपनीय विदेश दौऱ्यांचा तपशील द्यावा, भाजपाची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 20:52 IST

'राहुल गांधी 2014 पासून 16 वेळा विदेशात गेले.'

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यावरून भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार व प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी भाजपा मुख्यालयात पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी जगातील लोक मेडिटेशन (ध्यानधारणा) करण्यासाठी भारतात येतात. मात्र, यासाठी राहुल गांधी विदेशात जात आहेत. भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी गोपनीय दौरे करत आहेत, असे म्हणत जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

जीव्हीएल नरसिम्हा राव म्हणाले, "राहुल गांधी 2014 पासून 16 वेळा विदेशात गेले. त्यापैकी नऊ विदेशी दौऱ्यांबाबत काहीच माहिती नाही. राहुल गांधी जितक्या वेळा आपला मतदारसंघात गेले नाही. त्यापेक्षा जास्त वेळा विदेश दौरे केले. त्यामुळे त्यांना अमेठीतील जनतेने नाकारले." याचबरोबर, राहुल गांधी आपले विदेशी दौरे गोपनीय का ठेवतात? हे विदेशी दौरे गोपनीय ठेवण्यामागील हेतू कोणता, असे सवाल करत जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी यासंदर्भात भाजपा उत्तर मागणार असल्याचे सांगितले. 

तसेच, राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांचा खर्च कोण करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी सार्वजनिक केली पाहिजे. नियमानुसार, प्रत्येक खासदाराला आपल्या विदेश दौऱ्याची माहिती सार्वजनिक करावी लागते. कोण खासदार कुठे जातो? कधी जातो? याबाबतची माहिती देणे गरजेचे असते. संसदीय मंत्र्यांनी जुलै 2019 मध्ये सर्व खासदारांना पत्र लिहून त्यांच्या विदेशी दौऱ्यांचा तपशील मागविला आहे. राहुल गांधींनाही याची माहिती द्यावी लागणार आहे, असेही जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी सांगितले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा