शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

'काँग्रेसचे भ्रष्टाचाराला समर्थन, गांधी कुटुंबाचे 2000 कोटी वाचवण्याचा प्रयत्न', स्मृती इराणींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:24 IST

BJP On National Herald Case: राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर स्मृती इराणींनी हल्लाबोल केला आहे. तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप इराणी यांनी केला.

BJP On National Herald Case: नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. याविरोधात एकीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे भाजपने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "जे तुरुंगातून जामिनावर आहेत, त्यांनी दिल्लीला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. कारण काय तर, भ्रष्टाचार पकडला गेला आहे."

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, 'तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे लोक उघडपणे एजन्सीवर दबाव आणत आहेत. हे काँग्रेस पक्षाचे धोरण आहे का? 1930 च्या दशकात असोसिएट जनरल लिमिटेड (AJL) नावाची कंपनी स्थापन झाली, ज्याचे काम वृत्तपत्र प्रकाशित करणे होते. त्याचे पाच हजार भागधारक होते. ज्या वृत्तपत्रासाठी स्वातंत्र्यसैनिकांची हमी निश्चित करण्यात आली होती, त्या वृत्तपत्राचा भागभांडवल एका कुटुंबाला देण्यात आला,' असा आरोप इराणी यांनी केला.

'90 कोटींचे कर्ज माफ केले'स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, '2008 मध्ये या कंपनीने 90 कोटींचे कर्ज घेतले आणि प्रॉपर्टीच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये यंग इंडिया नावाची कंपनी 5 लाख रुपयात स्थापन झाली, ज्यामध्ये राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. फक्त 75 टक्के हिस्सा त्यांचा होता, बाकीचा हिस्सा त्यांच्या आई सोनिया गांधींसह इतर काही लोकांकडे होता. यानंतर एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले गेले. या कंपनीचे 99 टक्के शेअर्स यंग इंडियाला मिळाले. यानंतर काँग्रेस पक्ष एजेएल कंपनीला 90 कोटींचे कर्ज देते आणि नंतर ते माफही करते.'

काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांना प्रश्न...स्मृती पुढे म्हणाल्या की, 'आज माझा प्रश्न त्या लोकांना आहे, ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. काँग्रेस पक्षाला लोकशाही कार्यात सहभागी व्हावे यासाठी देणग्या दिल्या. काँग्रेस पक्षाने आपला पैसा गांधी घराण्याच्या मालकीच्या कंपनीला अर्पण करावा, हा अशा देणगीदारांचा हेतू होता का? 2016 मध्ये यंग इंडियाने कबूल केले होते की, 6 वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोणतेही धर्मादाय कार्य केले नाही.'

2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न त्या पुढे म्हणाल्या की, 'मला या लोकांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही राहुल गांधींना भेटलात तर त्यांना विचारा की त्यांचा डेक्स मर्चेंडाइज प्रायव्हेट लिमिटेडशी काय संबंध आहे? राहुल गांधींच्या सांगण्यावरून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आज जे काही करत आहेत, ते लोकशाही वाचवण्यासाठी नाही, थर गांधी परिवाराची 2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही इराणी यांनी केला.    

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSmriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेस