शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'काँग्रेसचे भ्रष्टाचाराला समर्थन, गांधी कुटुंबाचे 2000 कोटी वाचवण्याचा प्रयत्न', स्मृती इराणींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:24 IST

BJP On National Herald Case: राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर स्मृती इराणींनी हल्लाबोल केला आहे. तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप इराणी यांनी केला.

BJP On National Herald Case: नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. याविरोधात एकीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे भाजपने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "जे तुरुंगातून जामिनावर आहेत, त्यांनी दिल्लीला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. कारण काय तर, भ्रष्टाचार पकडला गेला आहे."

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, 'तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे लोक उघडपणे एजन्सीवर दबाव आणत आहेत. हे काँग्रेस पक्षाचे धोरण आहे का? 1930 च्या दशकात असोसिएट जनरल लिमिटेड (AJL) नावाची कंपनी स्थापन झाली, ज्याचे काम वृत्तपत्र प्रकाशित करणे होते. त्याचे पाच हजार भागधारक होते. ज्या वृत्तपत्रासाठी स्वातंत्र्यसैनिकांची हमी निश्चित करण्यात आली होती, त्या वृत्तपत्राचा भागभांडवल एका कुटुंबाला देण्यात आला,' असा आरोप इराणी यांनी केला.

'90 कोटींचे कर्ज माफ केले'स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, '2008 मध्ये या कंपनीने 90 कोटींचे कर्ज घेतले आणि प्रॉपर्टीच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये यंग इंडिया नावाची कंपनी 5 लाख रुपयात स्थापन झाली, ज्यामध्ये राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. फक्त 75 टक्के हिस्सा त्यांचा होता, बाकीचा हिस्सा त्यांच्या आई सोनिया गांधींसह इतर काही लोकांकडे होता. यानंतर एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले गेले. या कंपनीचे 99 टक्के शेअर्स यंग इंडियाला मिळाले. यानंतर काँग्रेस पक्ष एजेएल कंपनीला 90 कोटींचे कर्ज देते आणि नंतर ते माफही करते.'

काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांना प्रश्न...स्मृती पुढे म्हणाल्या की, 'आज माझा प्रश्न त्या लोकांना आहे, ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. काँग्रेस पक्षाला लोकशाही कार्यात सहभागी व्हावे यासाठी देणग्या दिल्या. काँग्रेस पक्षाने आपला पैसा गांधी घराण्याच्या मालकीच्या कंपनीला अर्पण करावा, हा अशा देणगीदारांचा हेतू होता का? 2016 मध्ये यंग इंडियाने कबूल केले होते की, 6 वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोणतेही धर्मादाय कार्य केले नाही.'

2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न त्या पुढे म्हणाल्या की, 'मला या लोकांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही राहुल गांधींना भेटलात तर त्यांना विचारा की त्यांचा डेक्स मर्चेंडाइज प्रायव्हेट लिमिटेडशी काय संबंध आहे? राहुल गांधींच्या सांगण्यावरून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आज जे काही करत आहेत, ते लोकशाही वाचवण्यासाठी नाही, थर गांधी परिवाराची 2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही इराणी यांनी केला.    

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSmriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेस