शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटींची ऑफर; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:06 IST

भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपवर करण्यात आला.  

ठळक मुद्देभाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपवर करण्यात आला.  आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये आणून ठेवलं आहे.गुजरात राज्यसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून मनी-मसल्स पावरचा वापर करून आमदारांना विकत घ्यायचे प्रयत्न सुरू होते.

बंगळुरू, दि. 31- गुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं होतं. या आमदारांची त्या रेसॉर्टमध्ये रविवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेसकडून भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले. भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला पक्ष सोडण्यासाठी 15 कोटी रूपयांची ऑफऱ दिल्याचा आरोप यावेळी भाजपावर करण्यात आला.  

'भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली. आमचे आमदार इथे मजा-मस्ती करण्यासाठी आलेले नाहीत, तर आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये आणून ठेवलं आहे. गुजरात राज्यसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून मनी-मसल्स पावरचा वापर करून आमदारांना विकत घ्यायचे प्रयत्न सुरू होते, असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि गुजरातचे आमदार शक्तीसिंह गोहिल म्हणाले आहेत. आम्ही एकमताने पक्षासोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला असून भाजपाला लोकशाहीचा अंत करू देणार नाही, असंही गोहिल म्हणाले आहेत. गुजरात काँग्रेसमधील गळती थांबविण्यासाठी काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 2 आमदार वैयक्तिक आणि राजकीय कारण सांगून गुजरामध्ये परत आले, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दोन आमदार परत माघारी गेल्यानंतर राहिलेल्या 42 आमदारांना माध्यमांसमोर हजर करण्यात आलं. यावेळी या आमदारांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना संपूर्ण पाठिंबा दर्शविला.

यावेळी गांधीनगरमधील दाहेगममधील आमदार कामिनीबेन बी राठोड यांनीही भाजपवर आरोप केलेय. मलाही भाजपने 15 कोटींची ऑफर दिली होती पण ती ऑफर नाकारल्याचं कामिनीबेन राठोड यांनी सांगितलं आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकलं आहे. 

पटेल जिंकणार नाहीत?राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडला असतानाच काँग्रेसचे एक ज्येष्ठ आमदार आणि शंकरसिंह वाघेला यांचे निकटवर्तीय राघवजी पटेल यांनी म्हटलं , अहमद पटेल यांच्यासाठी निवडणूक जिंकणे कठीण आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसचे आणखी २० आमदार पक्ष सोडतील. राघवजी पटेल यांनीही आपण राजीनामा देऊन भाजपात सहभागी होणार असल्याचे सूचित केले. सात आमदारांच्या एका गटाने मात्र त्यांच्यासोबत बंगळुरूला न जाण्याचा निर्णय घेतला. यात वाघेला आणि त्यांचे पुत्र महेंद्रसिंह वाघेला यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आमदारांना तिथे हलविले आहे.

उत्तर प्रदेशात सपाच्या दोन, बसपाच्या एका आमदाराचा राजीनामाउत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपाच्या एका विधान परिषद सदस्याने शनिवारी राजीनामा दिला. सभापती रमेश यादव यांनी सांगितले की, सपाचे आमदार बुक्कल नवाब आणि यशपाल सिंह तसेच बसपाचे ठाकूर जयवीर सिंह यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी लखनौ दौºयावर असतानाच तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पाच मंत्री सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना विधानसभा वा परिषदेवर निवडून आणणे गरजेचे आहे. योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा स्वतंत्र देव सिंह आणि मोहसिन रझा हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.या घटनाक्रमामुळे आता योगी आदित्यनाथ यांना निवडणूक लढविण्याची गरज पडणार नाही. विधान परिषदेवर ते निवडून येऊ शकतील. अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. बसपाच्या प्रमुख मायावती म्हणाल्या की, भाजपाला सत्तेच्या रक्ताची चटक लागली आहे. मणिपूर, गोवा, बिहार व आता गुजरातनंतर उत्तर प्रदेश यातून हेच दिसत आहे.

काँग्रेसचा आरोपगुजरात राज्य काँग्रेसचे प्रमुख भरत सोळंकी यांनी सांगितले की, भाजपा गलिच्छ राजकारण करत आहे. पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते आमच्या आमदारांना प्रलोभने दाखवीत आहेत. त्यामुळे आमचे आमदार एकजुटीने बंगळुरूला गेले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, आमदारांना पैशांच्या जिवावर शिकार करू पाहणाºया भाजपाविरुद्ध निवडणूक आयोगाने फौजदारी खटला दाखल करावा.