शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

सरकार स्थापण्याची भाजपला नाही घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 04:07 IST

कर्नाटकातील नाट्य संपण्यास लागेल वेळ : येदियुरप्पा केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत

संतोष ठाकूर नवी दिल्ली : सतरा बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत, तसेच त्यांना अपात्र ठरविण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांनी अद्याप निर्णय घेतल्याने त्यांची भवितव्य अंधातरी लटकले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याची भाजप घाई करणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांबाबत निर्णय घेतल्यानंतरच भाजप पुढची चाल करील, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कर्नाटकातील नाट्यावर पडदा पडण्याच वेळ लागेल. दुसरीकडे, बी.एस. येदियुरप्पा हेच मुख्यमंत्री असतील, असे मानले जात असले तरी एक गटाने त्यांच्या नावाला आक्षेप घेतला आहे. तेव्हा पक्षांतर्गत मतभेद मिटविण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.सूत्रांनुसार भाजपच नवनियुक्त संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष आणि येदियुरप्पा यांच्यात सख्य नाही. तेव्हा येदियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी या दोघांतील भांडण भाजपला मिटवावे लागेल. बी.एल. संतोष यांच्या इच्छेविरुद्ध एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री केल्यास नजीकच्या भविष्यात संघटना आणि सरकारमध्ये दरी उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे दोघांत सलोख्या घडवून आणण्यासावर भाजप लक्ष केंद्रित करणार आहे.

दक्षिणेकडील राज्यांत भाजपचा जम बसविण्यासाठी संतोष यांनी खूप मेहनत घेतली आहे. याचा विचार करूनच त्यांना अनेक वरिष्ठ पदांवर प्राधान्य देत संघटन सरचिटणीस करण्यात आले, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. ते राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारकही होते.

केंद्रीय नेतृत्व आणि संघटनेची संयुक्त ताकद प्रकट करणारे कर्नाटकातील सरकार असावे, असा केंद्रीय नेतृत्वाचा मानस आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची घाई न करता अंतर्गत मतभेद भाजपने दूर करण्यास प्राधान्य दिले आहे. तथापि, पक्षातील अनेकांना वाटते की, वयाची सत्तरी ओलांडलेले येदियुरप्पा यांच्यासाठी ही अंतिम संधी आहे. त्यांनी कर्नाटकात पक्ष नावारूपाला आणला. तेव्हा त्यांना संधी दिली जावी. संतोष यांचीही नाराजी ओढवून घ्यायची नसल्याने वरिष्ठ पातळीवर दोघांची मतभेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दोघांतील मतभेद २०१८ मध्ये पुढे आले होते.

केंद्रीय आदेशाच्या प्रतीक्षेतकर्नाटकात पर्यायी सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाची वाट पाहत, असे कर्नाटक प्रदेश भाजपचे अध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा यांनी बंगळुरू येथे सांगितले.प्रदेश मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मी दिल्लीहून आदेश मिळण्याची वाट पाहत आहे. कोणत्याही वेळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राजभवनात जाऊ शकतो. पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी संघ परिवाराचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण