शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

सरकार स्थापण्याची भाजपला नाही घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 04:07 IST

कर्नाटकातील नाट्य संपण्यास लागेल वेळ : येदियुरप्पा केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत

संतोष ठाकूर नवी दिल्ली : सतरा बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत, तसेच त्यांना अपात्र ठरविण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांनी अद्याप निर्णय घेतल्याने त्यांची भवितव्य अंधातरी लटकले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याची भाजप घाई करणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांबाबत निर्णय घेतल्यानंतरच भाजप पुढची चाल करील, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कर्नाटकातील नाट्यावर पडदा पडण्याच वेळ लागेल. दुसरीकडे, बी.एस. येदियुरप्पा हेच मुख्यमंत्री असतील, असे मानले जात असले तरी एक गटाने त्यांच्या नावाला आक्षेप घेतला आहे. तेव्हा पक्षांतर्गत मतभेद मिटविण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.सूत्रांनुसार भाजपच नवनियुक्त संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष आणि येदियुरप्पा यांच्यात सख्य नाही. तेव्हा येदियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी या दोघांतील भांडण भाजपला मिटवावे लागेल. बी.एल. संतोष यांच्या इच्छेविरुद्ध एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री केल्यास नजीकच्या भविष्यात संघटना आणि सरकारमध्ये दरी उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे दोघांत सलोख्या घडवून आणण्यासावर भाजप लक्ष केंद्रित करणार आहे.

दक्षिणेकडील राज्यांत भाजपचा जम बसविण्यासाठी संतोष यांनी खूप मेहनत घेतली आहे. याचा विचार करूनच त्यांना अनेक वरिष्ठ पदांवर प्राधान्य देत संघटन सरचिटणीस करण्यात आले, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. ते राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारकही होते.

केंद्रीय नेतृत्व आणि संघटनेची संयुक्त ताकद प्रकट करणारे कर्नाटकातील सरकार असावे, असा केंद्रीय नेतृत्वाचा मानस आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची घाई न करता अंतर्गत मतभेद भाजपने दूर करण्यास प्राधान्य दिले आहे. तथापि, पक्षातील अनेकांना वाटते की, वयाची सत्तरी ओलांडलेले येदियुरप्पा यांच्यासाठी ही अंतिम संधी आहे. त्यांनी कर्नाटकात पक्ष नावारूपाला आणला. तेव्हा त्यांना संधी दिली जावी. संतोष यांचीही नाराजी ओढवून घ्यायची नसल्याने वरिष्ठ पातळीवर दोघांची मतभेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दोघांतील मतभेद २०१८ मध्ये पुढे आले होते.

केंद्रीय आदेशाच्या प्रतीक्षेतकर्नाटकात पर्यायी सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाची वाट पाहत, असे कर्नाटक प्रदेश भाजपचे अध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा यांनी बंगळुरू येथे सांगितले.प्रदेश मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मी दिल्लीहून आदेश मिळण्याची वाट पाहत आहे. कोणत्याही वेळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राजभवनात जाऊ शकतो. पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी संघ परिवाराचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण