शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

भाजपाने समावेशक होणे आवश्यक- मित्रपक्षांचा सल्ला; टीडीपी बाहेर, सेना संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 05:34 IST

विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अस्वस्थता असून, आघाडी मजबूत ठेवण्यासाठी भाजपाने सहिष्णू व सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.

नवी दिल्ली : विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अस्वस्थता असून, आघाडी मजबूत ठेवण्यासाठी भाजपाने सहिष्णू व सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.रालोआतून तेलगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर पडली आहे. तर, शिवसेना द्विधा मन: स्थितीत असते. बिहारमधील जातीय हिंसाचारानंतर जनता दल (यू) लाही काळजी वाटू लागली आहे. जेडीयूचे नेते के.सी. त्यागी म्हणाले की, बिहारमध्ये कोणतेही संकट नाही. मात्र, आघाडीत समन्वय असायला हवा.ते म्हणाले की, एनडीए १ व एनडीए २ मध्ये खूप फरक आहे. नेतृत्वात बदल झालेला आहे. पण, सहकारी पक्षांसोबत समन्वयासाठी बैठका घेतल्या जाव्यात आणि मतभेद दूर करण्याची गरज आहे. केंद्रात जेडीयूचे प्रतिनिधित्व नाही. हा मुद्दा सोडविण्याची गरज आहे.उत्तर प्रदेशातील मंत्री आणि भारतीय समाज पार्टीचे नेते ओ.पी. राजभर यांनीही समन्वय नसल्यामुळे मतभेद होत असल्याचे मान्य केले. सर्व पक्षांनी एकत्र बसून मुद्दे सोडविण्याची गरज आहे. त्यासाठी रालोआच्या नियमित बैठका व्हायला हव्यात.बिहारमध्ये अन्यही अस्वस्थएनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह हेही सरकारवर नाराज आहेत. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये त्यांनी नुकतीच लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. कुशवाह यांनी पाटण्यात अलीकडेच जेडीयू- भाजप आघाडी सरकारविरुद्ध आंदोलनही केले होते. केंद्रीय मंत्री राम विलास पासवान हेही भाजपाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :BJPभाजपा