शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

Manish Sisodia: “मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 15:09 IST

Manish Sisodia: अण्णा हजारेंच्या शिष्याने संपूर्ण दिल्ली मद्यमय केली, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

Manish Sisodia: उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय कोठडी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने देशभरातील विविध राज्यांमध्ये जोरदार निदर्शने करत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भाजपवर निशाणा साधला. यातच मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला. 

मनीष सिसोदिया यांच्या अटकेबाबत आम आदमी पक्ष भाजप सरकारला अनेक प्रश्न विचारत आहे. विरोधी पक्षात राहिल्याने भाजप केजरीवाल सरकारला त्रास देत असल्याचे आपचे म्हणणे आहे. या सर्व विषयांवर जेपी नड्डा एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सविस्तर उत्तरे दिली. मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. 

मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?

या प्रश्नाला उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, हे काहीही शक्य नाही. अशा लोकांना आम्ही आमच्या पक्षात का घ्यायचे? ही बाब शक्य नाही. शिक्षणाच्या नावाखाली संपूर्ण दिल्ली मद्याच्या नशेत बुडवली. आयुष्यभर मद्याच्या विरोधात असणाऱ्या अण्णा हजारेंच्या शिष्याने संपूर्ण दिल्ली मद्यमय केली. अशा लोकांना घेऊन भाजप पुढे जाऊ शकत नाही, असे जेपी नड्डा यांनी सांगितले. 

दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काहीही सापडले नाही. मनीष सिसोदिया यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप भाजपचे लोक करतात. तसे असते तर त्यांच्या घरात थोडे तरी पैसे सापडले असते. रंगेहात भाजप नेत्याच्या मुलाला पकडले, पण मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. हा मोठा अन्याय आहे, असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाManish Sisodiaमनीष सिसोदियाanna hazareअण्णा हजारे