शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

'बाल दिना'ची तारीख बदलण्यासाठी भाजप खासदाराचे मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 10:23 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाची तारीख बदलण्याची विनंती तिवारी यांनी मोदींकडे केली आहे. तिवारी यांच्या यांच्यानुसार बालदिन 14 नोव्हेंबरऐवजी 26 डिसेंबरला साजरा करण्यात यावा. 26 डिसेंबररोजी बालदिन साजरा करून शिखांचे 10 वे धर्मगुरू गुरुगोविंद सिंग यांच्या दोन मुलांना श्रद्धांजली देता येईल, असा तर्क तिवारी यांचा आहे. 

देशात अनेक लहान मुलांनी बलिदान दिले आहे. मात्र साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग (गुरुगोविंद सिंग यांचे दोन मुलं) यांचे बलिदान सर्वोच्च आहे. 1705 मध्ये या दोघांनी सरहिंद येथे धर्माची रक्षा करताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या दोघांच्या बलिदान दिनी बालदिवस साजरा करण्यात यावा, अशी विनंती तिवारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे इतर मुलांना प्रेरणा मिळेल, असंही त्यांचं म्हणणे आहे. 

दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.