शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'बाल दिना'ची तारीख बदलण्यासाठी भाजप खासदाराचे मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 10:23 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाची तारीख बदलण्याची विनंती तिवारी यांनी मोदींकडे केली आहे. तिवारी यांच्या यांच्यानुसार बालदिन 14 नोव्हेंबरऐवजी 26 डिसेंबरला साजरा करण्यात यावा. 26 डिसेंबररोजी बालदिन साजरा करून शिखांचे 10 वे धर्मगुरू गुरुगोविंद सिंग यांच्या दोन मुलांना श्रद्धांजली देता येईल, असा तर्क तिवारी यांचा आहे. 

देशात अनेक लहान मुलांनी बलिदान दिले आहे. मात्र साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग (गुरुगोविंद सिंग यांचे दोन मुलं) यांचे बलिदान सर्वोच्च आहे. 1705 मध्ये या दोघांनी सरहिंद येथे धर्माची रक्षा करताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या दोघांच्या बलिदान दिनी बालदिवस साजरा करण्यात यावा, अशी विनंती तिवारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे इतर मुलांना प्रेरणा मिळेल, असंही त्यांचं म्हणणे आहे. 

दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.