शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

'बाल दिना'ची तारीख बदलण्यासाठी भाजप खासदाराचे मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 10:23 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाची तारीख बदलण्याची विनंती तिवारी यांनी मोदींकडे केली आहे. तिवारी यांच्या यांच्यानुसार बालदिन 14 नोव्हेंबरऐवजी 26 डिसेंबरला साजरा करण्यात यावा. 26 डिसेंबररोजी बालदिन साजरा करून शिखांचे 10 वे धर्मगुरू गुरुगोविंद सिंग यांच्या दोन मुलांना श्रद्धांजली देता येईल, असा तर्क तिवारी यांचा आहे. 

देशात अनेक लहान मुलांनी बलिदान दिले आहे. मात्र साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग (गुरुगोविंद सिंग यांचे दोन मुलं) यांचे बलिदान सर्वोच्च आहे. 1705 मध्ये या दोघांनी सरहिंद येथे धर्माची रक्षा करताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या दोघांच्या बलिदान दिनी बालदिवस साजरा करण्यात यावा, अशी विनंती तिवारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे इतर मुलांना प्रेरणा मिळेल, असंही त्यांचं म्हणणे आहे. 

दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.