शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

"सरपंचाने 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काही गैर नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:31 IST

BJP MP Janardan Mishra : भ्रष्टाचारात काहीच गैर नसल्याचं म्हणत मिश्रा यांनी गावपातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील भाजपाचे एक खासदार आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अजब विधान केलं आहे. गावातील सरपंचाने जर 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला, तर त्यात काहीही गैर नाही. 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. त्यामुळे सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर तरच आमच्याकडे तक्रार करा, असं विधान खासदाराने केला आहे. त्यांच्या या विधानाचा एका व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतं आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खासदार आहे. भ्रष्टाचारात काहीच गैर नसल्याचं म्हणत मिश्रा यांनी गावपातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला आहे. एखाद्या सरपंचाने 15 लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर मला सांगू नका. लाखो रुपये गुंतवून त्यांनं निवडणूक लढलेली असते. पुढील निवडणुकीसाठीही त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही सरपंचाने 15 लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार केला तर तो चुकीचा आहे, असं अजब विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे.

"15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला तर कृपया तक्रार करू नका"

भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी व्हिडीओमध्ये "गावातील सरपंचाने भ्रष्टाचार केला, अशी तक्रार घेऊन नागरिक जेव्हा माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांना म्हणतो की, त्यांनी 15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर कृपया आमच्याकडे तक्रार करू नका. जर सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला असेल, तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. कारण सरपंचाने निवडणुकीत 7 लाख रुपये गुंतवलेले असतात. तसेच पुढील निवडणुकीसाठी त्याला आणखी 7 लाखांची गरज असते. महागाई वाढली तर आणखी 1 लाख जोडा. त्यामुळे ते 15 लाख रुपयांचा घोळ करत असतील, तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. हीच समाजाची सद्यस्थिती आहे" असं म्हटलं आहे. 

जनार्दन मिश्रा यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. काही महिन्यांपूर्वी मिश्रा यांनी शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूली संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. शेतकऱ्यांकडे कर्जवसूलीसाठी कोणी आलं तर त्यांचे हात तोडू आणि गळा दाबून मारून टाकू असं जनार्दन मिश्रा यांनी म्हटलं होतं. पक्षाच्यावतीने 'किसान आक्रोश आंदोलना'चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मिश्रा यांनी असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाCorruptionभ्रष्टाचार