शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: “राज ठाकरेंचे स्वागतच करु, अयोध्या दौऱ्याला विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांना उपरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 11:34 IST

Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.

Brijbhushan Singh Statement On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या दौऱ्यावर जात रामलल्लाचे दर्शन घेतले. शिंदे गटासह भाजपचे नेते, मंत्री अयोध्येला गेले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना आता उपरती झाल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध नसून, त्यांचे स्वागतच करू, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. 

उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंनी केलेल्या विधानांबद्दल जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी घोषणाच बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यामुळे तणवपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आता बृजभूषण सिंह यांनी आपले राज ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नव्हते, त्यांनी एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच केला आहे, असे म्हटले आहे. 

मला कोणताही आक्षेप नाही, कुणालाच कोणता आक्षेप नाही

अयोध्या दौरा रद्द करून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा सन्मान केला. राज ठाकरेंशी माझे काही वैयक्तिक भांडण नाही. त्या वेळी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर म्हटले होते की, त्यांनी माफी मागावी आणि मग इकडे यावे. पण त्यांनी इथे न येऊन एक प्रकारे आमचा सन्मान केला आहे. त्यामुळे मोठा वाद टळला. आता मला वाटते की ते जर आले तर मला कोणताही आक्षेप नाही. कुणालाच कोणता आक्षेप नाही, असे बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले. 

अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे

राज ठाकरे यांनी तेव्हा वाद टाळून उत्तर भारतीयांचा एक प्रकारे सन्मानच केला. ते जरी स्वत:च्या तोंडून खेद व्यक्त करू शकले नाहीत किंवा दिलगिरी व्यक्त करू शकले नाहीत तरी न येणे हा एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच आहे. राज ठाकरेंच्या बाबतीत मला आता काहीही म्हणायचे नाही. जशी अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे. त्यांनी इकडे यावे, त्यांचे स्वागतच आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गतवर्षी ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. मनसेकडून तसे जाहीर करण्यात आले होते.  मात्र, बृजभूषण सिंह यांनी अयोध्येत राज ठाकरेंना प्रवेश करू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत थेट आव्हानच दिले होते. यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले होते. तसेच हा वाद  चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंनी अयोध्या दौरा पुढे ढकलला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्या