शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

लोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व सांगत होते भाजप आमदार; त्यांच्या मुलांची संख्या विचारताच म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 14:48 IST

भाजप आमदार सांगताहेत लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं महत्त्व; त्यांच्या अपत्यांबद्दल विचारताच भलतंच उत्तर

सिंगरौली: संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्यावरून चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे नेते या कायद्याचं समर्थन करत आहेत. सिंगरोली जिल्ह्याचे भाजप आमदार रामलल्लू वैश्य यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वैश्य लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं महत्त्व सांगत आहेत. विशेष म्हणजे वैश्य यांना नऊ मुलं आहेत. याबद्दल विचारलं असता ही मुलं देवाच्या इच्छेनं झाल्याचं त्यांनी सांगितलं.

मला १९९० नंतर मूल झालं नाही. मी आता ७८ वर्षांचा आहे. देवाच्या इच्छेनं हे सगळं झाल्याचं आमदार रामलल्लू वैश्य यांनी सांगितलं. आज लोकसंख्या नियंत्रण कायदा आल्यास तो सर्वांना लागू होईल, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. रामलल्लू वैश्य सिंगरौली मतदारसंघातून तीनदा निवडून आले आहेत. 'तुम्ही केवळ हिंदूंवर कायद्याचा बडगा उगाराल आणि मुस्लिमांना मोकळीक द्याल तर लोकसंख्या वाढ थांबेल का? त्यांना थांबवलं असतं, तर आम्हीदेखील थांबलो असतो,' असं वैश्य म्हणाले.

लोक माझं विधान चुकीच्या अर्थानं घेतात, असंदेखील वैश्य यांनी सांगितलं. 'कायदा सर्वांसाठी समान असायला हवा असं मला वाटतं. मग व्यक्ती हिंदू असो मुस्लिम असो शीख असो किंवा मग ख्रिश्चन असो. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. तुम्हाला ९ मुलं आहेत. तुम्ही काय नियंत्रण ठेवलंत, असा प्रश्न लोक मला विचारतात. मला १९९० नंतर एकही मूल झालं नाही. या गोष्टीला आता ३० वर्ष उलटून गेली आहेत, असं उत्तर मी प्रश्न विचारणाऱ्यांना देतो,' असं वैश्य म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपा