शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भाजपाचे आमदार फोडा, नाही तर कॉँग्रेसचे फोडून दाखवतो रावसाहेब दानवे : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांना थेट आव्हान

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

नाशिक : कॉँग्रेस पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात आहेत, या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर टीका करणारे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दानवे यांनी खुले आव्हान दिले आहे. कॉँग्रेस हे बुडते जहाज असल्याने तेथे आपण जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असे सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी कॉँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असे सांगत त्यांनी शड्डु ठोकला.

नाशिक : कॉँग्रेस पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात आहेत, या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर टीका करणारे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दानवे यांनी खुले आव्हान दिले आहे. कॉँग्रेस हे बुडते जहाज असल्याने तेथे आपण जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असे सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी कॉँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असे सांगत त्यांनी शड्डु ठोकला.
कॉँग्रेसचे एकवीस आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावर टीका करताना कॉँग्रेस प्रदेश माणिकराव ठाकरे यांनी मंत्रिपद जाणार असल्याने दानवे हेच कॉँग्रेसच्या संपर्कात असल्याची टीका केली होती. त्यावर पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी हे आव्हान दिले. माझा जन्म भाजपात झाला आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच मी ३५ वर्षे काम करतो आहे. सरपंचपदापासून कामे करताना कधी आमदार किंवा खासदार मंत्री होईल असे वाटले नव्हते. राज्यात पहिल्यांदा युतीची सत्ता आली तेव्हा मी आमदार होतो. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा आपण खासदार होतो, परंतु मंत्री नव्हतो. त्यामुळे आपल्याला लाल दिव्याचा मोह नाही, असे सांगून दानवे म्हणाले की कॉँग्रेस हे बुडते जहाज असल्याने त्यात बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
राज्यात भाजपा आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद असल्याचे त्यांनी इन्कार केला. दोन्ही पक्ष स्वतंत्र असल्याने दोन्ही पक्षांचे मंत्री येतात तेव्हा त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित असतात हे स्वाभाविक आहे, असे सांगून त्यांंनी फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीस खडसे अनुपस्थित असल्याने माध्यमांनी या चर्चा रंगवल्या. वास्तविक याच बैठकीस बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुनील मुनगं˜ीवारदेखील बैठकीस हजर नव्हते, परंतु त्यांच्याबाबत चर्चा झाली नाही, असेही ते म्हणाले.
आगामी काळात भाजपा पक्षीय बळ वाढविणार आहे. त्यादृष्टीनेच सभासद नोंदणी राबविले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर युती तुटणार काय याचा त्यांनी इन्कार केला. भाजपा आणि शिवसेना दोन स्वतंत्र पक्ष आहे. स्वतंत्र निवडणूक लढवून ते पुन्हा एकत्र आले. आता स्थानिक पातळीवर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने लढवाव्या स्वबळावर याबाबत स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहे. प्रदेश पातळीवरून केवळ त्याची मान्यता देण्यात येईल, असेही दानवे म्हणाले.