शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजपचे मिशन २०२४; केंद्रीय मंत्री, खासदारांना पंतप्रधानांनी केले सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 06:08 IST

मिशन २०२४ची तयारी, मतदारसंघासाठी वेळ देण्याच्या केल्या सूचना

संजय शर्मा नवी दिल्ली : मोदी सरकारमधील बहुतांश मंत्र्यांची राज्ये व त्यांच्या लोकसभा मतदारसंघांतून येणाऱ्या अहवालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतेत आहेत. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत पंतप्रधानांनी काही मंत्र्यांना बोलावून आपापल्या लोकसभा मतदारसंघासाठी जास्त वेळ देण्याचे व लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान मोदी हे वेळोवेळी आपल्या केंद्रीय मंत्र्यांबाबत अशा प्रकारचे सर्वेक्षण करतात. चिंतेचा विषय म्हणजे मोदींना आपल्याच सरकारच्या अनेक मंत्र्यांबाबत मिळणारे अहवाल समाधानकारक नाहीत. सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीस आता एक वर्षाचा कालावधी उरला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आपल्या सरकारचे मंत्री व भाजपच्या खासदारांना संकेतांतून सांगत आहेत की, त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी जास्त वेळ द्यावा व लोकांच्या समस्या ऐकण्याबरोबरच त्यांनी टीका केली, तरीही ती ऐकून घ्यावी. काही मंत्र्यांना पंतप्रधानांनी सल्ला दिला आहे की, सरकारमधील मंत्र्यांकडून लोकांच्या जास्त अपेक्षा असतात. त्या पूर्ण न झाल्यास लोक नाराजही होतात. 

उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, झारखंडच्या काही खासदारांना मोदींनी बोलावून माजी केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊन शिकण्यास सांगितले आहे. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद व प्रकाश जावडेकर यांच्याकडून विविध विषयांवर बोलण्याची कला शिकून घ्यावी, असेही सांगितले आहे.

जगदंबिका पाल यांचे दिले उदाहरणnसध्याच्या अधिवेशनाच्या कालावधीत पंतप्रधानांनी १२पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना सावध केले आहे. अनेकजण मतदारसंघांत वेळ देत नाहीत. nकाही मंत्र्यांना तर मोदींनी ७३ वर्षांचे भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्यापासून शिकण्यास सांगितले आहे. nजगदंबिका पाल हे एकमेव खासदार आहेत, जे अधिवेशनकाळात दररोज दिल्ली ते उत्तर प्रदेशातील आपला मतदारसंघ डुमरियागंजदरम्यान ये-जा करतात.

उत्तर प्रदेशातून ८० जागा जिंकण्याचे लक्ष्यपंतप्रधान उत्तर प्रदेशबाबत सर्वांत जास्त चिंतेत आहेत; कारण त्या राज्यातून यावेळी ८० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तथापि, लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप एक वर्ष बाकी आहे व सर्वेक्षणाच्या आधारावर केंद्रीय मंत्री आणि खासदारांचे तिकीट कापले जाऊ शकते. परंतु, पंतप्रधान मोदी आपल्या सरकारमधील मंत्री, खासदारांना स्थिती सुधारण्यासाठी सतर्क करीत आहेत.

कोण, किती जवळचा? nपंतप्रधान मोदी आपले मंत्री व खासदारांना अलीकडे देत असलेला सल्ला व संदेश महत्त्वाचा आहे. यामुळे काही मंत्री हवालदिल झाले आहेत, तर काही भाजप खासदार स्वत:साठी पंतप्रधानांचा पर्सनल टच मानत आहेत. nअर्थात, पंतप्रधान जेव्हा मंत्रिमंडळात फेरबदल करतील, तेव्हा कोणता मंत्री किंवा खासदार त्यांच्या किती जवळचा आहे, हे कळणारच आहे.

तुम्हीच प्रश्न विचारता, तुम्हीच उत्तर देता...एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याला तर पंतप्रधानांनी चांगलेच सुनावले. ते म्हणाले की, समोरच्याचा प्रश्नही न ऐकण्याएवढी तुम्ही गडबड करीत जाऊ नका. स्वत:च प्रश्न विचारत आहात व स्वत:च उत्तर देता, तर मग जनताही त्यांचे उत्तर देईल. या केंद्रीय मंत्र्यांची एक सवय आहे. त्यांना जो कोणी भेटेल त्याला ते म्हणतात, ‘कसे आहात. सर्व काही ठीक आहे?’

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक