शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

'बकरे की अम्मा कब तक ख़ैर मनाएगी?'; भाजपा मिडिया सेलचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 18:44 IST

सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधींना खासदारकीच्या मुद्द्यावर दिलासा

Jitendra Awhad, Rahul Gandhi: काँग्रेसचे वरिष्ठ फळीतील नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव बदनामी प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. विशेष न्यायालयाकडून राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा आणि खासदारकी रद्द अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यासोबतच पुढील सात वर्षे निवडणूकही न लढवण्याचेही बंधन होते. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र या मुद्द्यावरून राहुल गांधींना दिलासा दिला. राहुल यांना या प्रकरणातील शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, विरोधक सध्या भाजपावर तोंडसुख घेत आहेत. असे असताना, भाजपा मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मात्र राहुल गांधींवरच निशाणा साधला आहे.

"बकरे की अम्मा कब तक ख़ैर मनाएगी? राहुल गांधी यातून वाचले असतील पण किती दिवस? यापूर्वीच्या प्रसंगी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर चुकीची विधाने केल्याबद्दल ताशेरे ओढले होते, तशी निरीक्षण नोंदवली होती. याशिवाय, राहुल गांधींच्या विरोधात अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे मानहानीचे खटले प्रलंबित आहेत, ज्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाने दाखल केलेल्या आदरणीय वीर सावरकरांवर शाब्दिक चिखलफेक करण्याच्या हायप्रोफाइल केसचा समावेश आहे. नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात राहुल गांधी हे त्यांची आई सोनिया गांधी यांच्यासह आरोपी आहेत आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी ठरल्यास त्यांची खासदारकी पुन्हा अपात्र ठरू शकते. लालू प्रसाद, जे जयललिता यांसारख्या दिग्गज नेत्यांना दोषी ठरवल्यानंतर अपात्रतेचा सामना करावा लागला आहे हे विसरू नका. त्यामुळे सध्या राहुल गांधी काठावर आहेत," अशा शब्दांत भाजपा मिडिया सेल कडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ज्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे, त्या प्रकरणात त्यांना सर्वात आधी विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. यावर त्यांनी वरच्या कोर्टात अपील केले असता, राहुल गांधींना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. मग ते सर्वोच्च न्यायालयाच गेले. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या प्रकरणात राहुल यांना कमी शिक्षा करता आली असती, असे सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षण नोंदवले. राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कोणती कारणे दिली आहेत. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहिले असते, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा