शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

'बकरे की अम्मा कब तक ख़ैर मनाएगी?'; भाजपा मिडिया सेलचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 18:44 IST

सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधींना खासदारकीच्या मुद्द्यावर दिलासा

Jitendra Awhad, Rahul Gandhi: काँग्रेसचे वरिष्ठ फळीतील नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव बदनामी प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. विशेष न्यायालयाकडून राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा आणि खासदारकी रद्द अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यासोबतच पुढील सात वर्षे निवडणूकही न लढवण्याचेही बंधन होते. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र या मुद्द्यावरून राहुल गांधींना दिलासा दिला. राहुल यांना या प्रकरणातील शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, विरोधक सध्या भाजपावर तोंडसुख घेत आहेत. असे असताना, भाजपा मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मात्र राहुल गांधींवरच निशाणा साधला आहे.

"बकरे की अम्मा कब तक ख़ैर मनाएगी? राहुल गांधी यातून वाचले असतील पण किती दिवस? यापूर्वीच्या प्रसंगी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर चुकीची विधाने केल्याबद्दल ताशेरे ओढले होते, तशी निरीक्षण नोंदवली होती. याशिवाय, राहुल गांधींच्या विरोधात अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे मानहानीचे खटले प्रलंबित आहेत, ज्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाने दाखल केलेल्या आदरणीय वीर सावरकरांवर शाब्दिक चिखलफेक करण्याच्या हायप्रोफाइल केसचा समावेश आहे. नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात राहुल गांधी हे त्यांची आई सोनिया गांधी यांच्यासह आरोपी आहेत आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. यापैकी कोणत्याही बाबतीत दोषी ठरल्यास त्यांची खासदारकी पुन्हा अपात्र ठरू शकते. लालू प्रसाद, जे जयललिता यांसारख्या दिग्गज नेत्यांना दोषी ठरवल्यानंतर अपात्रतेचा सामना करावा लागला आहे हे विसरू नका. त्यामुळे सध्या राहुल गांधी काठावर आहेत," अशा शब्दांत भाजपा मिडिया सेल कडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ज्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे, त्या प्रकरणात त्यांना सर्वात आधी विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. यावर त्यांनी वरच्या कोर्टात अपील केले असता, राहुल गांधींना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. मग ते सर्वोच्च न्यायालयाच गेले. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या प्रकरणात राहुल यांना कमी शिक्षा करता आली असती, असे सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षण नोंदवले. राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कोणती कारणे दिली आहेत. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहिले असते, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा