शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

“CM उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:43 IST

उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसाने उत्तर देण्याच्या केलेल्या आवाहनानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हनुमान चालिसेचा मुद्दा राज्यातील राजकारणात चांगलाच तापताना दिसत आहे. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर (Maha Vikas Aghadi) निशाणा साधला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर हनुमान चालिसा, रामभक्त हनुमंतांचे कीर्तन भजन बंद करून दाखवा, असा थेट इशारा दिला आहे. 

किरीट सोमय्या यांनी दिल्लीत नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणा दाम्पत्यांनी दिल्लीत जाऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारला कोर्टाच्या एवढ्या चपराक पडल्यात की, उद्धव ठाकरेंचे गाल सुजले आहेत. पोलीस प्रशासनाचा वापर सरकार माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार असल्याचे एल्गार किरीट सोमय्या यांनी केला. 

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करा

ठाकरे सरकारने हद्द केली आहे. खासदार आणि आमदारांना धमकी घेतात. वीस फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. लोकसभा अध्यक्षांना भेटून ठाकरे सरकारच्या या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे ठणकावून सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, हिंदुस्थानचे कोट्यवधी लोक हनुमानाची पूजा करतात. आम्ही हनुमान भक्त आहोत. जेव्हा रावण जन्माला येतात, त्यांच्या लंकेला हनुमानच जाळून टाकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा, हनुमानाचे भजन-कीर्तन बंद करून दाखवावे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

दरम्यान, शिवसेनेच्यावतीने येत्या १४ मे रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी नवी दिल्लीत महाराष्ट्र सरकार विरोधात आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदबुद्धी द्यावी, यासाठी नवी दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणा आहोत, असे रवी राणा यांनी जाहीर केले आहे. तुम्ही सभेत आम्ही मर्द आहोत. मर्दासारखे काम करतो असे वारंवार म्हणता. पण तुम्ही एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकून तिला चुकीची वागणूक देऊन तुमचा नामर्दपणा दाखवून दिला आहे. तुम्ही जेव्हा भाजपाशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात त्याच दिवशी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. तुम्ही त्याच दिवशी सर्व शिवसैनिकांना पोरके केले, अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवि राणाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी