शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“CM उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:43 IST

उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसाने उत्तर देण्याच्या केलेल्या आवाहनानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हनुमान चालिसेचा मुद्दा राज्यातील राजकारणात चांगलाच तापताना दिसत आहे. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर (Maha Vikas Aghadi) निशाणा साधला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर हनुमान चालिसा, रामभक्त हनुमंतांचे कीर्तन भजन बंद करून दाखवा, असा थेट इशारा दिला आहे. 

किरीट सोमय्या यांनी दिल्लीत नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणा दाम्पत्यांनी दिल्लीत जाऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारला कोर्टाच्या एवढ्या चपराक पडल्यात की, उद्धव ठाकरेंचे गाल सुजले आहेत. पोलीस प्रशासनाचा वापर सरकार माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार असल्याचे एल्गार किरीट सोमय्या यांनी केला. 

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करा

ठाकरे सरकारने हद्द केली आहे. खासदार आणि आमदारांना धमकी घेतात. वीस फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. लोकसभा अध्यक्षांना भेटून ठाकरे सरकारच्या या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असे ठणकावून सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, हिंदुस्थानचे कोट्यवधी लोक हनुमानाची पूजा करतात. आम्ही हनुमान भक्त आहोत. जेव्हा रावण जन्माला येतात, त्यांच्या लंकेला हनुमानच जाळून टाकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा, हनुमानाचे भजन-कीर्तन बंद करून दाखवावे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

दरम्यान, शिवसेनेच्यावतीने येत्या १४ मे रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी नवी दिल्लीत महाराष्ट्र सरकार विरोधात आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदबुद्धी द्यावी, यासाठी नवी दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणा आहोत, असे रवी राणा यांनी जाहीर केले आहे. तुम्ही सभेत आम्ही मर्द आहोत. मर्दासारखे काम करतो असे वारंवार म्हणता. पण तुम्ही एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकून तिला चुकीची वागणूक देऊन तुमचा नामर्दपणा दाखवून दिला आहे. तुम्ही जेव्हा भाजपाशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात त्याच दिवशी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. तुम्ही त्याच दिवशी सर्व शिवसैनिकांना पोरके केले, अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवि राणाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी