शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

"संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये", भाजपा महिला उपाध्यक्षाचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 13:10 IST

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार राज्याची प्रतिमा अपराध मुक्त राज्य अशी करत आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच ...

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार राज्याची प्रतिमा अपराध मुक्त राज्य अशी करत आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते भर व्यासपीठावरुन महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राज्यातील महिलांनाच घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देत आहेत. उत्तराखंडच्या माजी राज्यपाल आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष बेबी रानी मौर्य यांनी वाराणसीतील एका कार्यक्रमात महिलांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊ नये, असं विधान केलं आहे. 

वाराणसीतील बजरडीहामध्ये भाजपाच्या वाल्मिकी महोत्सव अंतर्गत मलिन वस्ती येथे महिलांसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. बेबी रानी मौर्य या कार्यक्रमात संबोधित करत होत्या. महिलांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊ नये, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. इतकंच नव्हे, तर शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नसल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. 

"पोलीस ठाण्यात महिला अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक जरी उपलब्ध असले तरी मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते की संध्याकाळी ५ वाजल्यानंतर म्हणजेच अंधार झाल्यानंतर महिलांनी पोलीस ठाण्यात कधीच जाऊ नये. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात जावं आणि अगदीच गरज असेल तर आपला भाऊ, पती किंवा वडिलांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात जावं", असं बेबी रानी मौर्य म्हणाल्या. 

शेतकऱ्यांना खत वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी एक उदाहरणच दिलं. "सर्व अधिकारी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतात. मला नुकतंच आग्रा येथून एका शेतकऱ्याचा फोन आला होता. त्याला खत मिळत नव्हतं. मी सांगितलं तर त्याला खत उपलब्ध झालं. पण आज अधिकारी खत देण्यास नकार देत आहेत. अधिकाऱ्यांकडूनच स्थानिक पातळीवर फसवणुकीचं काम केलं जात आहे. या गोष्टी लोकांनीच स्थानिक पातळीवर पाहिल्या पाहिजेत. कोणताही अधिकारी फसवणुकीचं काम करत असेल तर त्याची तक्रार स्थानिकांनी डीएम, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करायला हवी", असंही बेबी रानी मौर्य म्हणाल्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ