शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्राने भूमिका मागे घेतलेली नाही, सुप्रीम कोर्टात ठामपणे बाजू मांडणार”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 21:31 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: अमित शाहांनी घेतलेल्या बैठकीत नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक बैठक घेतली. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत नेमके काय झाले, याबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे दोन मुख्यमंत्री कर्नाटकात जाणार होते, त्यावेळेस कर्नाटकाने पत्र पाठवून आक्षेप घेतला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यावर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तसे पत्र पाठवण्यात आले. किंबहुना भविष्यात आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना निमंत्रित करू आणि कोणाच्याही येण्या-जाण्यावर कुठलीही बंदी नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

महाराष्ट्रात तशी मानसिकता होती, पण आम्ही त्यांना समजावले

कर्नाटकात जे झाले, तसे महाराष्ट्रात आम्ही कोणालाही असे करू दिले नाही. ज्यावेळेस महाराष्ट्रातील वाहनांवर तिथे हल्ला करण्यात आला, त्यावेळेस इथेही काही लोकांची तशी मानसिकता होती. मात्र, आम्ही त्यांना समजावले. आणि आवश्यकता पडली, तिथे कारवाई केली, असे सांगत आम्ही त्यांनाही आपण एका देशात राहतो, असे प्रकार घडता कामा नयेत, असे सांगितले आहे. यावर त्यांनीही ही बाब मान्य करत असे काही प्रकार घडत असतील, तर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी प्रथमच केंद्र सरकारने हस्तक्षेप केला

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी प्रथमच केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना एकत्रित बोलावले. तीन मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. ती सीमेवर राहणाऱ्या नागरिकांसाठीच नेमलेली आहे. दोन्ही राज्ये आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हीही आमची भूमिका मागे घेतलेली नाही. जी भूमिका घेतली आहे, तीच घेऊन सर्वोच्च न्यायालयात लढणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. केसेस लावल्या जातात, मराठीचा प्रश्न येतो, शाळा बंद केल्या जातात, या विषयांच्या मूळाशी जाऊन मार्ग काढण्याचे या समितीचे काम असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

केंद्राने न्यायाची बाजू घ्यावी, ही आमची भूमिका

या मंत्र्यांच्या समितीला आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारही मदत करेल. हाही महत्त्वाचा विषय आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वादाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात तटस्थ भूमिका असली पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे. कोणत्याही राज्याच्या बाजूने केंद्र सरकार भूमिका घेणार नाही. मध्यंतरी राज्याच्या बाजूने भूमिका घेतल्याची प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे केंद्राने कोणाचीही बाजू न घेता, न्यायाची बाजू घ्यावी, ही आमची भूमिका आम्ही मांडली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसborder disputeसीमा वादCentral Governmentकेंद्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे