शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

भाजपा-केजरीवालांमध्ये कलगीतुरा

By admin | Updated: June 15, 2016 06:02 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय सचिव हे पद दुहेरी लाभाच्या श्रेणीतून वगळणारे दिल्ली सरकारचे विधेयक फेटाळून लावल्याच्या मुद्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय सचिव हे पद दुहेरी लाभाच्या श्रेणीतून वगळणारे दिल्ली सरकारचे विधेयक फेटाळून लावल्याच्या मुद्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भारतीय जनता पक्षात वाक्युद्ध सुरू झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय सूड भावनेतून कारवाई करीत असून आम आदमी पार्टीला (आप) भाजपा घाबरली आहे आणि गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतील पराभव हा पक्ष पचवू शकलेला नाही, असा आरोप केजरीवाल यांनी मंगळवारी केला. तर भाजपानेही विधेयक नामंजूर केल्यामुळे राष्ट्रपती कार्यालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या केजरीवालांवर हल्लाबोल करीत विनाकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लक्ष्य साधण्याचा रोगच त्यांना जडला असल्याचे टीकास्त्र सोडले. भाजपाचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा म्हणाले की, केजरीवालांना नैराश्य आले आहे कारण त्यांच्या गगनभरारी घेणाऱ्या आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रपतींच्या निर्णयाला राजकीय मुद्दा बनवू नये. पक्ष मुख्यलयात माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. भारताचे राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाचे कार्यालय ही एक स्वायत्त संस्था असून त्यांची फार मोठी विश्वासार्हता आहे याकडे लक्ष वेधून पात्रा यांनी सांगितले की, केजरीवालांच्या काही राजकीय महत्त्वाकांक्षा असू शकतात. लोकशाही व्यवस्थेत ते योग्यही आहे. परंतु कृपया राष्ट्रपतींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. यामुळे देशाच्या लोकशाहीचे नुकसान आहे. राष्ट्रपतींनी हे विधेयक फेटाळल्याने आपच्या २१ आमदारांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. त्यांची संसदीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आमदारांना अपात्र ठरविण्याचा मुद्दा राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाकडे असून भाजपाचे त्याच्याशी काही देणेघेणे नाही, असे पात्रा यांचे म्हणणे होते. सोबतच या प्रकरणी तक्रारकर्ते एक स्वतंत्र वकील असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. (वृत्तसंस्था)मोदी काम करू देत नाहीत-केजरीवालदरम्यान केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना विधेयक नामंजूर होण्यामागे मोदींचीच राजकीय सूडभावना असल्याचा आरोप केला आहे. आम्ही आमच्या आमदारांवर अतिरिक्त जबाबदारी सोपविली. यासाठी त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नसून ते मोफत काम करीत आहेत. याचा मोदींना काय त्रास होत आहे? सर्वांना अपात्र ठरवून घरी बसविल्यास केंद्राला काय मिळणार? दिल्लीतील पराभव पचवू न शकल्यानेच ते आम्हाला काम करू देत नाहीत.केजरीवाल यांनी राजीनामाद्यावा; काँग्रेसने केली मागणीकेजरीवाल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि त्या २१ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनेही केली आहे. या २१ आमदारांना संसदीय सचिव म्हणून नेमताना त्यांना कोणत्या सुविधा मिळणार, हे जाहीर करण्यात आले होते. आॅफिस आॅफ प्रॉफिटच्या तत्वाचे या प्रकरणात उल्लंघन झाले आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रवक्ते पी. एल. पुनिया म्हणाले की, याबाबत केजरीवाल खोटी माहिती जनतेला देत आहेत. नैतिकचेची थोडीशी जरी चाड असेल, तर त्यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायलाच हवा.काय आहे प्रकरणदिल्ली सरकारने संसदीय सचिव पदांवर आमदारांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या योग्य ठरविण्यासाठी दिल्ली विधानसभा सदस्य (अपात्रता हटविणे) कायदा १९९७ मध्ये एक दुरुस्ती करणारे विधेयक आणले होते. या विधेयकाच्या माध्यमाने संसदीय सचिवांना अपात्रतेच्या तरतुदीपासून सवलत देण्याची सरकारची मनीषा होती. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी हे विधेयक केंद्राकडे वर्ग केले होते. पुढे केंद्राने आपल्या निरीक्षणासह ते राष्ट्रपतींकडे पाठविले होते. याप्रकरणी सखोल अध्ययनानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय सचिवपद दुहेरी लाभाच्या श्रेणीतून वगळणारे हे विधेयक सोमवारी फेटाळून लावले.