शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Budget 2019: मोदी सरकार मांडणार पूर्ण अर्थसंकल्प? दलित, ओबीसी असणार केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:23 IST

पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी भाजपा नेते आग्रही

नवी दिल्ली: गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी मतदारांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लेखानुदानाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. तर संसदीय परंपरांचं उल्लंघन करु नका, अशा इशारा काँग्रेसनं भाजपाला दिला आहे. निवडणुकीआधी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पासाठी लेखानुदान शब्द वापरण्यावर भाजपामधील काही नेत्यांनी आक्षेप घेतला. 1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्पाप्रमाणेच असावा, असं भाजपामधील काही नेत्यांना वाटतं. या अर्थसंकल्पातून कराच्या बाबतीत काही सवलती देता येणार नाही. मात्र आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जावा, असं मानणारा मोठा वर्ग भाजपामध्ये आहे. या वर्गानं पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात यावा, असा सूर लावल्याचं वृत्त 'नवभारत टाईम्स'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. कोणत्याही अर्थसंकल्पाचा अर्थ पूर्ण अर्थसंकल्पच असतो. एक तारखेला सादर होणारा अर्थसंकल्प नेहमीसारखाच असेल अशी अपेक्षा आहे, असं भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलं. या अर्थसंकल्पातून मोदी सरकार दलित, ओबीसी, आदिवासी यांच्यासह व्यापारी, सवर्णांना दिलासा द्यायचा प्रयत्न करणार असल्याचं समजतं. भाजपाच्या या पूर्ण अर्थसंकल्पावर काँग्रेसनं आक्षेप घेतला. लेखानुदानाच्या परंपरेचं पालन करा, असा इशारा काँग्रेसनं दिला. मात्र काँग्रेसनं पूर्वी या परंपरेचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं प्रत्युत्तर भाजपानं दिलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBudget 2019अर्थसंकल्प 2019BJPभाजपा