शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सत्ता टिकवण्यासाठी भाजपाची 29 पक्षांशी आघाडी, मित्रपक्षांसाठी जिंकलेल्या जागांवरही सोडले पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 22:20 IST

2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे या होऊ घातलेल्या महाआघाडीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजपानेही कंबर कसली आहे.  2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. तसेच या मित्रपक्षांसाठी आपण जिंकलेल्या जागा सोडण्यापर्यंतचे औदार्य भाजपाकडून दाखवण्यात येत आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये 16 मित्रपक्षांचा समावेश होता. या सर्व पक्षांनी एकत्र येत ती निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. मात्र त्यावेळी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपाला मित्रपक्षांची तेवढी गरज उरली नव्हती. त्यामुळेच शतप्रतिशत भाजपाचा नारा देत भाजपा नेत्यांनी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात केली होती. पण गेल्या काही काळात बदललेली राजकीय परिस्थिती, काही राज्यात झालेला पराभव यामुळे मित्रपक्षांशी जुळवून घेण्याची भूमिका भाजपाने स्वीकारली आहे. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक पक्षांना सामावून घेण्याचा धडाका भाजपाने लावला आहे. सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत छोटे आणि मोठे मिळून 29 पक्ष सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने अगदी मुक्तहस्ते या पक्षांना जागावाटप केले आहे. बिहारपासून सुरुवात करायची झाल्यास बिहारमध्ये जिंकलेल्या 22 जागांपैकी पाच जागा भाजपाने मित्रपक्षांना सोडल्या आहेत. येथे भाजपाची जेडीयू आणि एलजेपी या पक्षांसोबत आघाडी आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये सलग पाच वेळा जिंकलेली गिरिडिह लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाने एजेएसयू या मित्रपक्षाला सोडली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची युतीची गाठ नव्याने बांधण्यात यश मिळवल्यावर भाजपाने आपल्या खात्यातील दोन अधिकच्या जागाही आपल्या या जुन्या मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. या जागांमध्ये पालघरच्या जिंकलेल्या जागेचाही समावेश आहे.  दरम्यान, दक्षिणेत तामिळनाडूमध्येही एआयएडीएमकेच्या रूपात भाजपाला मित्रपक्ष मिळाला आहे. तसेच डीएमडीके हा पक्षही या आघाडीत सहभागी झाला आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपावर नाराज असलेल्या मित्रपक्षांची समजूत घालण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. ओमप्रकाश राजभर आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना विविध समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण