शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सत्ता टिकवण्यासाठी भाजपाची 29 पक्षांशी आघाडी, मित्रपक्षांसाठी जिंकलेल्या जागांवरही सोडले पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 22:20 IST

2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे या होऊ घातलेल्या महाआघाडीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजपानेही कंबर कसली आहे.  2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. तसेच या मित्रपक्षांसाठी आपण जिंकलेल्या जागा सोडण्यापर्यंतचे औदार्य भाजपाकडून दाखवण्यात येत आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये 16 मित्रपक्षांचा समावेश होता. या सर्व पक्षांनी एकत्र येत ती निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. मात्र त्यावेळी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपाला मित्रपक्षांची तेवढी गरज उरली नव्हती. त्यामुळेच शतप्रतिशत भाजपाचा नारा देत भाजपा नेत्यांनी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात केली होती. पण गेल्या काही काळात बदललेली राजकीय परिस्थिती, काही राज्यात झालेला पराभव यामुळे मित्रपक्षांशी जुळवून घेण्याची भूमिका भाजपाने स्वीकारली आहे. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक पक्षांना सामावून घेण्याचा धडाका भाजपाने लावला आहे. सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत छोटे आणि मोठे मिळून 29 पक्ष सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने अगदी मुक्तहस्ते या पक्षांना जागावाटप केले आहे. बिहारपासून सुरुवात करायची झाल्यास बिहारमध्ये जिंकलेल्या 22 जागांपैकी पाच जागा भाजपाने मित्रपक्षांना सोडल्या आहेत. येथे भाजपाची जेडीयू आणि एलजेपी या पक्षांसोबत आघाडी आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये सलग पाच वेळा जिंकलेली गिरिडिह लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाने एजेएसयू या मित्रपक्षाला सोडली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची युतीची गाठ नव्याने बांधण्यात यश मिळवल्यावर भाजपाने आपल्या खात्यातील दोन अधिकच्या जागाही आपल्या या जुन्या मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. या जागांमध्ये पालघरच्या जिंकलेल्या जागेचाही समावेश आहे.  दरम्यान, दक्षिणेत तामिळनाडूमध्येही एआयएडीएमकेच्या रूपात भाजपाला मित्रपक्ष मिळाला आहे. तसेच डीएमडीके हा पक्षही या आघाडीत सहभागी झाला आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपावर नाराज असलेल्या मित्रपक्षांची समजूत घालण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. ओमप्रकाश राजभर आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना विविध समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण