शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घोड्यांसोबत गाढवाची शर्यत! भाजप मंत्र्याचा राहुल गांधींवर हल्लाबोल, केली बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 16:12 IST

"अशा प्रकारचा मेलोड्रामा करायची आवश्यकता नाही. देशातील जनता स्वतःच त्याचा निर्यण करतील. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. यामुळे प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे."

मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. यानंतर देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. विरोधक मोदी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत देशभरात निषेध करत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर बोचऱ्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. घोड्यांबरोबर गाढवांची शर्यत लावली जात असल्याचे ते म्हणाले. खरे तर, सोमवारी संसदेत प्रवेश करताना पत्रकारांनी त्यांना विरोधकांच्या निदर्शनासंदर्भात प्रश्न केला असता, हरदीप सिंग पुरी म्हणाले, कुठे प्रभू रामचंद्र आणि कुठे हे लोक...

राहुल गांधींसंदर्भात बोलताना पुरी म्हणाले, ते म्हणतात की मी सावरकर नाही, म्हणून मी माफी मागणार नाही. आपल्याला माहीत आहे, सावरकरजींचे योगदान काय आहे? हे जसे काही घोड्यांसोबत गाढवाची शर्यत सुरू आहे, असे चालले आहे. एवढेच नाही, तर कायदा व्यवस्था, राजकारणात काय चातले आणि काय चालत नाही, यावर या लोकांनी गांभीर्याने आत्ममंथन करायला हवे. अशा प्रकारचा मेलोड्रामा करायची आवश्यकता नाही. देशातील जनता स्वतःच त्याचा निर्यण करतील. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. यामुळे प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 

जर लोकशाहीत न्यायालयाने काही निर्णय दिला असेल तर, त्यावर महाभारत करण्याची कारण काय आहे? असा सवालही पुरी यांनी केला. तत्पूर्वी, 'मोदी' आडणावावरून टिप्पणी केल्याबद्दल राहुल गांधी यांना गुजरातमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांचे संसदेतील सदस्यत्व गेले आहे. विरोधक याला षड्यंत्र आणि सत्तेचा दुरुपयोग म्हणत आहेत. याच बरोबर, राहुल गांधी यांनीही आपण माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस