शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

घोड्यांसोबत गाढवाची शर्यत! भाजप मंत्र्याचा राहुल गांधींवर हल्लाबोल, केली बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 16:12 IST

"अशा प्रकारचा मेलोड्रामा करायची आवश्यकता नाही. देशातील जनता स्वतःच त्याचा निर्यण करतील. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. यामुळे प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे."

मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. यानंतर देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. विरोधक मोदी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत देशभरात निषेध करत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर बोचऱ्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. घोड्यांबरोबर गाढवांची शर्यत लावली जात असल्याचे ते म्हणाले. खरे तर, सोमवारी संसदेत प्रवेश करताना पत्रकारांनी त्यांना विरोधकांच्या निदर्शनासंदर्भात प्रश्न केला असता, हरदीप सिंग पुरी म्हणाले, कुठे प्रभू रामचंद्र आणि कुठे हे लोक...

राहुल गांधींसंदर्भात बोलताना पुरी म्हणाले, ते म्हणतात की मी सावरकर नाही, म्हणून मी माफी मागणार नाही. आपल्याला माहीत आहे, सावरकरजींचे योगदान काय आहे? हे जसे काही घोड्यांसोबत गाढवाची शर्यत सुरू आहे, असे चालले आहे. एवढेच नाही, तर कायदा व्यवस्था, राजकारणात काय चातले आणि काय चालत नाही, यावर या लोकांनी गांभीर्याने आत्ममंथन करायला हवे. अशा प्रकारचा मेलोड्रामा करायची आवश्यकता नाही. देशातील जनता स्वतःच त्याचा निर्यण करतील. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. यामुळे प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 

जर लोकशाहीत न्यायालयाने काही निर्णय दिला असेल तर, त्यावर महाभारत करण्याची कारण काय आहे? असा सवालही पुरी यांनी केला. तत्पूर्वी, 'मोदी' आडणावावरून टिप्पणी केल्याबद्दल राहुल गांधी यांना गुजरातमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांचे संसदेतील सदस्यत्व गेले आहे. विरोधक याला षड्यंत्र आणि सत्तेचा दुरुपयोग म्हणत आहेत. याच बरोबर, राहुल गांधी यांनीही आपण माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस