शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भाजप सरकार झोपेच्या मूडमध्ये; प्रियांका गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 06:09 IST

नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांनी विकासात अडथळा आला आहे, असा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत.

नवी दिल्ली : महागाईच्या मुद्यावर सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, याप्रकरणी सरकार झोपेच्या मूडमध्ये दिसत आहे. त्या म्हणाल्या की, अनेक ठिकाणी कांदा २०० रुपये किलो विक्री होत आहे, तर, पेट्रोलचे दर ७५ रुपये प्रतिलिटरपेक्षा अधिक झाले आहेत. ही महागाई भडकलेली असताना भाजप सरकार अद्यापही झोपेच्या मूडमध्ये दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेच्या मुद्यावर काँग्रेस सातत्याने सरकारवर टीका करीत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांनी विकासात अडथळा आला आहे, असा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत.

श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ

मोदी सरकारने केवळ श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ केले, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. निधीअभावी मोदी सरकार शिक्षण बजेटमध्ये ३००० कोटी रुपयांची कपात करणार असल्याचे वृत्त येत आहे.या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी सरकारवर ही टीका केली आहे. त्यांनी हिंदीतून टष्ट्वीट केले आहे की, भाजप सरकारने आपल्या श्रीमंत मित्रांचे ५.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे.

आपल्या श्रीमंत मित्रांना सहा विमानतळे दिली आहेत; पण शिक्षण बजेटमध्ये ३००० कोटींची कपात होत आहे. मोठे लोक रसगुल्ला खात आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात मीठ आणि रोटी मिळत आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा