शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत सरकार वि. प्रशासन; केजरीवालांच्या योजनांत खोडा; निवडणुकांपूर्वीच आपसमोर नवी अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 06:32 IST

राजधानीतील कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले

नवी दिल्ली:दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांआधीच आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजधानीतील वातावरण तापले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाने निवडणुकांचा समोर ठेवत जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना या सरकारी योजनांना भाजप सरकारने दिल्ली सरकारी विभागांच्या माध्यमातून विरोध केला आहे. त्यावरून आपने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे भाजप आणि आपला लक्ष्य करून काँग्रेसने श्वेतपत्रिका जाहीर केली आहे.

दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभाग आणि आरोग्य विभागाने बुधवारी एक नोटीस जारी करून आम आदमी पार्टी (आप) च्या महिलांना २,१०० रुपये आणि वृद्ध नागरिकांना मोफत उपचार देण्याच्या योजनांपासून स्वतःला लांब ठेवले आहे, ज्यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

या 'अस्तित्वहीन' योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी कुणालाही माहिती शेअर करू नये, असे दोन्ही विभागांनी नागरिकांना आवाहन केले.

आप फसवणूक करते आहे; भाजपचा आरोप 

भारतीय जनता पक्षाने आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अस्तित्वात नसलेल्या योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन देऊन महिला आणि वृद्धांची राजकीय फसवणूक' केल्याचा आरोप केला आहे. 

भाजपच्या खासदार स्वराज यानी मंगळवारी दावा केला की, सांगितले की, 'संजीवनी योजना' नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. दोन्ही योजनांच्या घोषणा केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकांना समोर ठेवून केल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी कोणताही पुढाकार घेऊ नये.

आतिशी यांनाही अटक होण्याची शक्यता

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेला भाजप घाबरले आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली. दिल्ल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीपासून आणि प्रचारातून 'आप'चे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपने तपास यंत्रणांना मुख्यमंत्री आतिशी यांना बनावट प्रकरणात अटक करण्याचे आदेश दिल्याचे आम्हाला समजले आहे. आतिशी यांना अटक करण्यापूर्वी सर्व वरिष्ठ आप नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यात माझ्यासह मनीष सिसोदिया, संजय सिंह, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन आणि यांचा समावेश असेल, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

काँग्रेसची श्वेतपत्रिका 

दिल्लीच्या दुर्दशेला आम आदमी पार्टी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसने दोन्ही सरकारच्या 'काळ्या कृत्यां विरोधात श्वेतपत्रिका जारी केली.

दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीने 'मौका-मौका, हर बार धोका' नावाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये पक्षाने दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने पूर्तता न केलेल्या आश्वासनांची माहिती दिली. 

ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कोषाध्यक्ष अजय माकन म्हणाले की, 'दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत, त्यामुळे जनता त्रस्त आहे, जनता या दोघांमध्ये अडकली आहे. 

गेल्या अनेक वर्षांत या दोन्ही सरकारांनी दिल्लीला द्वेषाची राजधानी बनविले आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा