शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

"जेएनयूचं नाव बदला, स्वामी विवेकानंदाचं नाव द्या; विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल"

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 20:14 IST

पंतप्रधान मोदींनी जेएनयूतील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर भाजप महासचिवांची मागणी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे महासचिव सी. टी. रवी यांनी जेएनयूचं नामांतर करण्याची मागणी केली आहे. जेएनयूचं नाव बदलून स्वामी विवेकानंद विद्यापीठ करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी सी. टी. रवी यांनी ट्विटद्वारे केली आहे. 'स्वामी विवेकानंद कायम भारताच्या विचारधारेसाठी ठामपणे उभे राहिले. त्यांची मूल्य भारताचं सामर्थ्य दाखवतात. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं नाव बदलून त्याला स्वामी विवेकानंदांचं नाव देणं उचित ठरेल. देशभक्त संताचं जीवन पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल,' असं मत रवी यांनी व्यक्त केलं आहे. रवी यांच्याकडे नुकतीच पक्षानं गोवा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.याआधीही झालीय नामांतराची मागणीजेएनयूचं नामांतर करण्याची मागणी याआधीही झाली आहे. वायव्य दिल्लीचे भाजप खासदार हंसराज हंस यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी केली होती. जेएनयूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्याची मागणी हंस यांनी केली होती. जेएनयूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा आक्षेपभाजप महासचिव सी. टी. रवी यांनी केलेल्या नामांतराच्या मागणीला जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. 'जेएनयू म्हणजे केवळ नाही तर ५० वर्षांचा इतिहास आहे. इथे समाजातल्या प्रत्येक वर्गाला शिक्षणाची संधी मिळते. भाजपला जेएनयूबद्दल इतकीच कळकळ असेल तर त्यांनी देशातल्या प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात जेएनयूसारखं विद्यापीठ उभारावं,' असं मत जेएनयूचा विद्यार्थी सनी धीमाननं व्यक्त केलं.

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा