शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात मोठ्या पक्षाला भाजपाने स्थापन करू दिले नव्हते सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:21 IST

कर्नाटकात सर्वाधिक जागा आपल्या पक्षालाच मिळाल्या असल्याने राज्यपालांनी आम्हालाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे, असे भाजपा नेते म्हणत असले तरी यापूर्वी किमान तीन राज्यांमध्ये भाजपाने नेमके याउलट राजकारण केले होते.

नवी दिल्ली : कर्नाटकात सर्वाधिक जागा आपल्या पक्षालाच मिळाल्या असल्याने राज्यपालांनी आम्हालाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे, असे भाजपा नेते म्हणत असले तरी यापूर्वी किमान तीन राज्यांमध्ये भाजपाने नेमके याउलट राजकारण केले होते. त्या राज्यांत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही तिथे अन्य पक्षांची मदत घेत वा त्यांना मदत करून भाजपाने तिथे सरकार स्थापन केले होते.>मेघालय : याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ६0 पैकी २१ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर भाजपाला अवघ्या २ जागांवरच विजय मिळाला होता. तरीही भाजपाने तेथील एनपीपी (विजयी आमदार १९ ) यूडीपी (विजयी जागा ६) यांना हाताशी धरून सरकार स्थापन करायला लावले. तिथे सर्वाधिक जागा मिळालेल्या काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी बोलावण्यातच आले नाही.>मणिपूरगेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत ६0 पैकी तब्बल २८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यांना सरकार स्थापनेसाठी केवळ तीन जागांची गरज होती. पण २१ जागा जिंकणाऱ्या भाजपाने तिथेही एनपीपी व एलजेपी या दोन प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. तिथेही सर्वात मोठा पक्ष असलेला निकष पाळण्यात आला नाही.>गोवा : गेल्या वर्षी निवडणुका झाल्या आणि ४0 जागांपैकी १७ जागांवर काँग्रेस विजयी झाली. भाजपाला १३ जागाच मिळवता आल्या.पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्र गोमांतक पक्ष, तीन अपक्ष व अन्य यांच्या साह्याने तिथे भाजपाचे सरकार बनेल, अशी व्यवस्था केली. तिथेही सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला राज्यपालांनी सरकार स्थापन करू दिले नाही. इतकेच नव्हे, तर तिथे मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत होत नसल्याने भाजपाने संरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना गोव्यात पुन्हा धाडले. ते तिथे मुख्यमंत्री बनले.>कोणता निकष लावणार?सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलावण्याची पद्धत आहे. त्यामुळे भाजपाने कर्नाटकात तसा दावाही केला आहे. पण त्या पक्षाकडे केवळ १0४ आमदार आहेत आणि बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज आहे. म्हणजेच तेवढा आकडा भाजपाकडे नाही. याउलट काँग्रेस वजनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्याकडे मिळून११५ आमदार आहेत. त्यामुळे राज्यपाल वजुभाई वालातिथे काय निकष लावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले. त्यांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेसाठी बोलावल्यास त्यातून आमदारांची फोडाफोडी व त्यासाठी करोडो रुपयांचे व्यवहार होतील, यात शंकाच नाही.

टॅग्स :BJPभाजपाKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८