शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सर्वात मोठ्या पक्षाला भाजपाने स्थापन करू दिले नव्हते सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:21 IST

कर्नाटकात सर्वाधिक जागा आपल्या पक्षालाच मिळाल्या असल्याने राज्यपालांनी आम्हालाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे, असे भाजपा नेते म्हणत असले तरी यापूर्वी किमान तीन राज्यांमध्ये भाजपाने नेमके याउलट राजकारण केले होते.

नवी दिल्ली : कर्नाटकात सर्वाधिक जागा आपल्या पक्षालाच मिळाल्या असल्याने राज्यपालांनी आम्हालाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे, असे भाजपा नेते म्हणत असले तरी यापूर्वी किमान तीन राज्यांमध्ये भाजपाने नेमके याउलट राजकारण केले होते. त्या राज्यांत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही तिथे अन्य पक्षांची मदत घेत वा त्यांना मदत करून भाजपाने तिथे सरकार स्थापन केले होते.>मेघालय : याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ६0 पैकी २१ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर भाजपाला अवघ्या २ जागांवरच विजय मिळाला होता. तरीही भाजपाने तेथील एनपीपी (विजयी आमदार १९ ) यूडीपी (विजयी जागा ६) यांना हाताशी धरून सरकार स्थापन करायला लावले. तिथे सर्वाधिक जागा मिळालेल्या काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी बोलावण्यातच आले नाही.>मणिपूरगेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत ६0 पैकी तब्बल २८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यांना सरकार स्थापनेसाठी केवळ तीन जागांची गरज होती. पण २१ जागा जिंकणाऱ्या भाजपाने तिथेही एनपीपी व एलजेपी या दोन प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. तिथेही सर्वात मोठा पक्ष असलेला निकष पाळण्यात आला नाही.>गोवा : गेल्या वर्षी निवडणुका झाल्या आणि ४0 जागांपैकी १७ जागांवर काँग्रेस विजयी झाली. भाजपाला १३ जागाच मिळवता आल्या.पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्र गोमांतक पक्ष, तीन अपक्ष व अन्य यांच्या साह्याने तिथे भाजपाचे सरकार बनेल, अशी व्यवस्था केली. तिथेही सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला राज्यपालांनी सरकार स्थापन करू दिले नाही. इतकेच नव्हे, तर तिथे मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत होत नसल्याने भाजपाने संरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना गोव्यात पुन्हा धाडले. ते तिथे मुख्यमंत्री बनले.>कोणता निकष लावणार?सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलावण्याची पद्धत आहे. त्यामुळे भाजपाने कर्नाटकात तसा दावाही केला आहे. पण त्या पक्षाकडे केवळ १0४ आमदार आहेत आणि बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज आहे. म्हणजेच तेवढा आकडा भाजपाकडे नाही. याउलट काँग्रेस वजनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्याकडे मिळून११५ आमदार आहेत. त्यामुळे राज्यपाल वजुभाई वालातिथे काय निकष लावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले. त्यांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेसाठी बोलावल्यास त्यातून आमदारांची फोडाफोडी व त्यासाठी करोडो रुपयांचे व्यवहार होतील, यात शंकाच नाही.

टॅग्स :BJPभाजपाKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८