शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Mumbai Cruise Drug Case: “संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करतायत का”; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:17 IST

Mumbai Cruise Drug Case: नवाब मलिक हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयाला दिले पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत शेतकऱ्यांबद्दल कधीही चकार शब्द बोलत नाहीतसंजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करतायत कात्यांना केवळ राजकारण करायचे आहे

नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरून एकीकडे नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळत असून, दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेत्यांची खंडणीखोर अधिकाऱ्यासाठी वकिली सुरू असल्याची टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून, संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करत आहेत का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

मुंबई आणि महाराष्ट्राला ज्याप्रमाणे ड्रग्जचा विळखा पडला आहे, तरुणाई बर्बाद होतेय, त्याविरुद्ध लढायच्या ऐवजी संजय राऊतांसारखे लोकं त्यांना समर्थन देत असतील, तर आपण म्हणतो ना की, ईश्वरच मालक आहे, अशीच परिस्थिती निर्माण होईल. परंतु, मला त्यांना उत्तर द्यायची इच्छा  नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. संजय राऊत यांचा उद्देश एवढाच आहे की, मूळ मुद्द्यांपासून सगळ्या गोष्टी, सगळे लक्ष भटकले पाहिजे. मूळ मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

संजय राऊत शेतकऱ्यांबद्दल कधीही चकार शब्द बोलत नाहीत

संजय राऊत शेतकऱ्यांबद्दल कधीही चकार शब्द बोलत नाहीत. मराठवाड्यात इतका भयानक पाऊस झाला. शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट झाली. त्यांना एक नवा पैसा मिळालेला नाही. त्याहीबद्दल ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना काय उत्तर द्यावे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

तुमच्याजवळ असलेले पुरावे न्यायालयात सादर करावे

नवाब मलिक सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीका करत असल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलतान, कुठल्याही तपास अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या टार्गेट करणे हे योग्य नाही. तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत, ते न्यायालयात सादर करा. यासंदर्भात न्यायालयात केस सुरू आहे. संविधानिक पदावर असलेली व्यक्ती बाहेर बोलते मात्र न्यायालयात पुरावे देत नाही, हे चुकीचे आहे. फिर्यादी पक्षाची विश्वासार्हता कमी करण्याचे काम सरकारी तंत्राने व्हायला लागले, तर यापुढे कुठलीच केस कुठेही टिकणार नाही आणि एक नवीन चुकीची पद्धत तयार होईल. त्यामुळे नवाब मलिक हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयाला दिले पाहिजेत. दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नीने सर्व पुरावे दिले आहेत. मात्र, मलिकांचा ग्रिव्हियन्स वेगळा आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, अशी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकSanjay Rautसंजय राऊत