शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 03:52 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे.

- समीर परांजपेलोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे. मात्र पश्चिम बंगालमधील यशामुळे या पक्षाचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला आहे. या राज्यातील ४२ पैकी १८ लोकसभा जागांवर विजय मिळवून भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला आहे. तृणमूल काँग्रेसला ४३.२८ टक्के तर भाजपला ४०.२५ टक्के मते मिळाली आहेत.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या आघाडीने लोकसभेच्या केवळ दोन जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.शिवप्रकाश पश्चिम बंगालमध्ये भाजपची संघटना बळकट करत असतानाच राजकीय आघाडी कैलाश विजयवर्गीय यांनी सांभाळली. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्याची कामगिरी त्यांनी चोखपणे बजावली. माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमधून २०१७ साली भाजपत आले ही मोठी घटना होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदार, नेत्यांसह बारा-तेरा जणांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले. ममता बॅनर्जी यांचा एककल्ली स्वभाव व कारभार याला बंगालमधील अनेक लोक कंटाळले होते. डावी आघाडी, काँग्रेस मरगळलेले असल्याने त्यांना तृणमूल काँग्रेसविरोधात एक सशक्त पर्याय हवा होता. २८ मार्च ते १ मे या कालावधीत बंगालमध्ये मोदींच्या १० तर शहांच्या ११ सभा पार पडल्या.कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रॅलीमध्ये जो हिंसाचार झाला ती उंटावरील शेवटची काडी ठरली. तृणमूल काँग्रेस व भाजपने एकमेकांवर हिंसाचार घडविल्याचे आरोप केले असले तरी मतदार वस्तुस्थिती जाणून होता. त्याने तृणमूल काँग्रेसला जिव्हारी बसेल असा फटका दिला.भाजपचे संघटन पश्चिम बंगालमध्ये मजबूत करण्याची कामगिरी त्या पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते शिवप्रकाश यांच्यावर २०१५ साली सोपविण्यात आली.पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एकेक पाऊल उचलण्यात येत होते. त्यानंतरच्या तीन वर्षांत या राज्यामध्ये भाजपच्या मंडलांची संख्या ४१५हून १२८०पर्यंत वाढविण्यात आली.उत्तर बंग, नवदीप, रार बंग, हुगळी मिदनापूर, कोलकाता अशा पाच विभागांत पक्षवाढीसाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. या कामात संघाचे स्वयंसेवक अरविंद मेनन, ओडिशाचे भाजप नेते सुरेश पुजारी यांचाही सिंहाचा वाटा होता. पण त्याचा गवगवा करणे भाजपने टाळले.>विधानसभेतहीकडवे आव्हाननिवडणुकांत मतांच्या टक्केवारीचे प्रमाण पाहिले तर पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी १६४ मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसला चांगली मते मिळाली आहेत. भाजपने १२१ विधानसभा मतदारसंघांत मतांची उत्तम बेगमी केली आहे. हे आकडे लक्षात घेता या राज्यात २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसचा भाजप हाच मुख्य प्रतिस्पर्धी असेल हे स्पष्ट होते. ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागांमध्येही भाजप व तृणमूलमध्ये कडवी लढत झाली.>मै नही मानतीसांप्रदायिकता के रंग मे मुझे नही है विश्वाससभी धर्मोमे है उग्रता, नम्रतामै हूं नम्र जागरण की एक सहिष्णू सेविकाउत्थान हुआ जिसका बंगाल मेविश्वास नही मुझे सामयिक उग्र धर्म बेचने मेमेरा विश्वास है मानवता धर्म केआलोक से आलोकित धर्म मेधर्म बेचना है जिनका ताशधर्म पहाड पर है पैसोंका वास?मै रत हूं नीज कर्मोंमेकर्महीन हो तूम सब!इसलिए बिकता है उग्रता धर्म?विश्वास है जिन्हे सहिष्णूता मेआइए जाग्रत कीजिएसमवेत सभी आइएजब वसुधैव कुटुंबकम्तो क्यो है हिसाब-किताब?उग्रता है जिसकी अभिलाषममता बॅनर्जी एक राजकारणी आहेत. तसेच त्या कवयित्री, चित्रकार आणि संगीतज्ञसुद्धा आहेत. निवडणुकांच्या निकालापूर्वी त्यांनी फेसबुकवर स्वत:चा सिंथेसायझर वाजवित असलेला व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. ‘राजनीती’ शीर्षकाची त्यांची एक कविता खूप चर्चेत होती. ‘मै नही मानती’ या त्यांच्या कवितेवर सुमारे ७ हजार लाइक्स मिळाल्या असून १ हजाराहून अधिक ‘नेटिझन्स’नी या कवितेबद्दल ‘रिट्विट’ केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Mamata Banerjeeममता बॅनर्जी