शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

'एनआरसीवरून भाजपने दहशत निर्माण केली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 02:44 IST

६ बळी गेल्याचा ममतांचा दावा; मूल्यांना सुरुंग लावल्याचा आरोप

कोलकाता : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्सवरून (एनआरसी) भाजपने दहशत निर्माण केल्याचा आरोप सोमवारी करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआरसीमुळे राज्यात सहा जणांचा बळी गेल्याचा दावा केला. कामगार संघटनांच्या येथील बैठकीत बोलताना बॅनर्जी यांनी आम्ही राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नाही.बंगालमध्ये किंवा देशात कुठेही एनआरसी अंमलात येणार नाही. आसाममध्ये त्याची अंमलबजावणी झाली ती आसाम करारामुळे, असे त्या म्हणाल्या. १९८५ मध्ये राजीव गांधी यांचे सरकार आणि आॅल आसाम स्टुडंटस् युनियन यांच्यात ‘आसाम करार’ झाला होता.बांगला देशातून बेकायदेशीरपणे येऊन आसाममध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांविरुद्ध सहा वर्षे चाललेले आंदोलन या करारामुळे संपले होते.पश्चिम बंगालमध्ये एनआरसीवरून दहशत निर्माण करणाºया भारतीय जनता पक्षाचा धिक्कार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी राज्यात एनआरसी लागू करू देणार नाही, असे बॅनर्जी तपशील न देता म्हणाल्या.आसाममध्ये नुकतीच एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यातून १९ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. एनआरसीत नाव असणे हा भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आहे. देशात भाजप लोकशाही मूल्यांना सुरुंग लावत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.सरकारी मालकीच्या उपक्रमांचे खासगीकरण आणि ते बंद करण्याच्या निषेधार्थ देशभर १८ आॅक्टोबर रोजी मोर्चे निघणार आहेत आणि मी त्यात सहभागी होणार आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले. १९ सप्टेंबर रोजी जादवपूर विद्यापीठात जे काही झाले त्याचा संदर्भ देऊन बॅनर्जी म्हणाल्या की, अभाविप आणि भाजपने विद्यापीठात काय केले हे संपूर्ण बंगालने पाहिले आहे.भाजपला राजकीय हिताची चिंता‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे. परंतु देशाच्या अनेक भागांत तिला धोका निर्माण झाला आहे. भाजप नोकºया, रोजगार बुडाल्याबद्दल, देशाची अर्थव्यवस्था घसरत असल्याबद्दल काही बोलत नाही. त्याला फक्त त्याच्या राजकीय हिताची चिंता आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा