शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अबब... १८ महिन्यांत १८५ कोटींनी वाढली भाजपा उमेदवाराची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 13:42 IST

प्रत्येक निवडणुकीगणिक राजकारणी लोकांची संपत्ती कैक पटींनी वाढणे ही आता सामान्य बाब बनली आहे.

बंगळुरू - प्रत्येक निवडणुकीगणिक राजकारणी लोकांची संपत्ती कैक पटींनी वाढणे ही आता सामान्य बाब बनली आहे. कर्नाटकमधील विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान असाच एक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकमधील होसकोटे मतदारसंघातील भाजपा उमेदवार एमटीबी नागराज यांच्याकडील संपत्तीमध्ये १८ महिन्यांत १८५ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. एमटीबी नागराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रामधून ही माहिती समोर आली आहे.

एमटीबी नागराज यांनी २०१८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर होसकोटे मतदारसंघातून विजय मिळवला होता. तसेच काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. दरम्य़ान या १८ महिन्यांच्या काळात नागराज यांच्या संपत्तीत १८५ कोटींनी वाढ झाली आहे.

 एमटीबी नागराज यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार १८ महिन्यात त्यांची संपत्ती १८५. ७ कोटी रुपयांनी वाढली आहे. शपथपत्रानुसार एप्रिल २०१८ मध्ये त्यांची एकूण संपत्ती १०६३ कोटी रुपये इतकी होती. दरम्यान, बंडखोरी केल्यानंतर नागराज यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना त्यांची अपात्रता कायम ठेवली होती. मात्र त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती.

 दरम्यान, भाजपा प्रवक्ते मधुसुदन यांनी नागराज यांच्या संपत्तीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, नागराज देशातील त्या श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत जे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आपली पत्नी आणि नातेवाईकांची संपत्ती जाहीर करत असतात. नागराज यांनी तीन वेळा कर्नाटक विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. तसेच काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये ते गृहनिर्माणमंत्री होते.

गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरतेचा अनुभव घेत असलेल्या कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून,  राज्यातील सरकार टिकवण्यासाठी सध्या सत्तेवर असलेल्या येडियुरप्पा आणि भाजपाला या निवडणुकीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने काँग्रेस आणि जेडीएसमधून बंडखोरी करून पक्षात आलेल्या अपात्र आमदारांना उमेदवारी दिली आहे. मात्र पक्षांतर करून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने भाजपामधील अनेक नेते नाराज झाले असून, त्यांच्या नाराजीमुळे पोटनिवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक