शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

बीजेपी म्हणजे ‘ब्रेक जनता प्रॉमिस’, विरोधी पक्षांनीही केले भाजपाला लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:04 IST

तेलगू देसम पार्टीने शुक्रवारी केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडताना, भाजपा म्हणजे ‘बे्रक जनता प्रॉमिस’ असा आरोप केला.

नवी दिल्ली : तेलगू देसम पार्टीने शुक्रवारी केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडताना, भाजपा म्हणजे ‘बे्रक जनता प्रॉमिस’ असा आरोप केला. दिल्लीतील वेगवान राजकीय घडामोडीत वायएसआर काँग्रेसने सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला असतानाच शुक्रवारी सकाळी तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रालोआतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.त्यानंतर संसद भवनाबाहेर बोलताना तेलगू देसमचे नेते रमेश, टी. नरसिम्हन आणि रवींद्र बाबू म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध आम्ही सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल करत आहोत. तेलगू देसमचे खा. जयदेव गल्ला म्हणाले की, भाजपा गलिच्छ खेळ खेळत आहे. त्यांनी तामिळनाडूत हेच केले. आधी लहान पक्षांना फूस देऊन नंतर मोठ्या पक्षांत फूट पाडली. आंध्र प्रदेशातही असाच खेळ करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. आंध्र प्रदेशातील अबकारी खात्याचे मंत्री के.एस. जवाहर म्हणाले की, भाजपाने अगोदर तेलगू जनतेला फसविले होतेच. या वेळीही ते हेच करीत आहेत. राज्यसभेतील तेलगू देसमचे सदस्य वाय. एस. चौधरी म्हणाले की, सरकारने आंध्र प्रदेशातील जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.आंध्रातही त्रिपुरा घडेल : भाजपाभाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हन राव म्हणाले की, २०१९ मधील निवडणुकीत तेलगू देसमला पराभवाची धास्ती वाटत आहे. त्यामुळे राजकीय जनाधार मिळविण्यासाठी तेलगू देसमने हे नाटक सुरू केले आहे. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना ४ वर्षे याबाबत काहीच का वाटले नाही? भाजपाला आंध्रात वाढण्याची खूप संधी आहे. आमच्यासाठी हे राज्य म्हणजे पुढचे त्रिपुरा ठरेल.>विरोधकांनी केले स्वागतपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रालोआतून बाहेर पडण्याच्या तेलगू देसमच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मी देशातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन करते की, अत्याचार, आर्थिक आपत्ती आणि राजकीय अस्थिरता यांच्याविरुद्ध सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे.माकपचे नेते सीताराम येचुरी म्हणाले की, सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाचे आम्ही समर्थन करत आहोत. आंध्रला विशेष दर्जा देण्याबाबत सरकारने विश्वासघात केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी म्हणाले की, आमचा पक्ष अविश्वास प्रस्तावाचे समर्थन करेल. मोदी सरकार केवळ राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यातच नव्हे, तर तरुणांना रोजगार देण्यातही अपयशी ठरले आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू