शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

बीजेपी म्हणजे ‘ब्रेक जनता प्रॉमिस’, विरोधी पक्षांनीही केले भाजपाला लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:04 IST

तेलगू देसम पार्टीने शुक्रवारी केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडताना, भाजपा म्हणजे ‘बे्रक जनता प्रॉमिस’ असा आरोप केला.

नवी दिल्ली : तेलगू देसम पार्टीने शुक्रवारी केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडताना, भाजपा म्हणजे ‘बे्रक जनता प्रॉमिस’ असा आरोप केला. दिल्लीतील वेगवान राजकीय घडामोडीत वायएसआर काँग्रेसने सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला असतानाच शुक्रवारी सकाळी तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रालोआतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.त्यानंतर संसद भवनाबाहेर बोलताना तेलगू देसमचे नेते रमेश, टी. नरसिम्हन आणि रवींद्र बाबू म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध आम्ही सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल करत आहोत. तेलगू देसमचे खा. जयदेव गल्ला म्हणाले की, भाजपा गलिच्छ खेळ खेळत आहे. त्यांनी तामिळनाडूत हेच केले. आधी लहान पक्षांना फूस देऊन नंतर मोठ्या पक्षांत फूट पाडली. आंध्र प्रदेशातही असाच खेळ करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. आंध्र प्रदेशातील अबकारी खात्याचे मंत्री के.एस. जवाहर म्हणाले की, भाजपाने अगोदर तेलगू जनतेला फसविले होतेच. या वेळीही ते हेच करीत आहेत. राज्यसभेतील तेलगू देसमचे सदस्य वाय. एस. चौधरी म्हणाले की, सरकारने आंध्र प्रदेशातील जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.आंध्रातही त्रिपुरा घडेल : भाजपाभाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हन राव म्हणाले की, २०१९ मधील निवडणुकीत तेलगू देसमला पराभवाची धास्ती वाटत आहे. त्यामुळे राजकीय जनाधार मिळविण्यासाठी तेलगू देसमने हे नाटक सुरू केले आहे. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना ४ वर्षे याबाबत काहीच का वाटले नाही? भाजपाला आंध्रात वाढण्याची खूप संधी आहे. आमच्यासाठी हे राज्य म्हणजे पुढचे त्रिपुरा ठरेल.>विरोधकांनी केले स्वागतपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रालोआतून बाहेर पडण्याच्या तेलगू देसमच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मी देशातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन करते की, अत्याचार, आर्थिक आपत्ती आणि राजकीय अस्थिरता यांच्याविरुद्ध सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे.माकपचे नेते सीताराम येचुरी म्हणाले की, सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाचे आम्ही समर्थन करत आहोत. आंध्रला विशेष दर्जा देण्याबाबत सरकारने विश्वासघात केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी म्हणाले की, आमचा पक्ष अविश्वास प्रस्तावाचे समर्थन करेल. मोदी सरकार केवळ राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यातच नव्हे, तर तरुणांना रोजगार देण्यातही अपयशी ठरले आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू