शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'या' कारणांमुळे भाजपाने तोडली पीडीपीसोबतची युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:34 IST

ही युती तुटण्यासाठी गेल्या काही दिवसांतील तात्कालिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.

श्रीनगर: भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यावेळी राम माधव यांनी राज्यातील गेल्या तीन वर्षांतील अपयशाचे सर्व खापर मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रॅटिक (पीडीपी) पक्षावर फोडले. भाजपाच्या या अनपेक्षित निर्णयाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. मात्र, ही युती तुटण्यासाठी गेल्या काही दिवसांतील तात्कालिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. केंद्र सरकारकडून रमजानच्या महिन्यात काश्मीरमध्ये शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधातील सर्व कारवाया थांबवण्यात आल्या होत्या. ही मुदत काल संपुष्टात आली आणि लष्कराच्या ऑल आऊट मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, पीडीपीने शस्त्रसंधीची ही मुदत आणखी काही काळ वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपाने या मागणीला केराची टोपली दाखवत लष्कराला काश्मीरमध्ये पुन्हा फ्री हँड दिला होता.याशिवाय, राम माधव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पीडीपीशी युती तोडण्याच्या निर्णयामागील आणखी काही कारणे सांगितली. तीन वर्षात आम्ही पीडीपीसोबत राज्यातील कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही काळापासून काश्मीर खोऱ्यातील कट्टरतवादी घटकांचा प्रभाव आणि अशांतता वाढतच आहे. संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे काश्मीरमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यादृष्टीने पोषक वातावरण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती कारणीभूत आहेत, असे आमचे म्हणणे नाही. आम्हाला त्यांच्या हेतुंविषयी कोणतीही शंका नाही. मात्र, काश्मीरमध्ये शांतता राखण्यात त्यांना अपयश येत आहे, हेच वास्तव आहे. राज्याच्या विकासाबाबतही हीच अडचण आहे. भाजपाच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांच्या माध्यमातून ते जम्मू-काश्मीरचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, सरतेशेवटी सर्व अधिकार मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे असल्याने त्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे राम माधव यांनी सांगितले.  

टॅग्स :BJP-PDPभाजपा-पीडीपीAmit Shahअमित शाह